शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

जलयुक्त शिवारसाठी स्वतंत्र प्राधिकरण

By admin | Updated: April 7, 2017 05:50 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली.

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली.यावर्षी जलयुक्त शिवार योजनेतील निधी अखर्चित राहिला आहे. याबाबत भाजपाचे परिणय फुके यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. पाऊस आणि निवडणूक आचारसंहितेमुळे काही कामे उशिराने सुरू झाली. एकूण २१ कोटी १४ लाख रुपयांचा निधी अखर्चिक राहिला होता; मात्र तो मार्चअखेरीला खर्च करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या वर्षी २०,०१५ कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी १३, ५८२ कामे पूर्ण झाली आहेत. तर, ६,४३३ कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.जलयुक्त शिवारसाठी गावे निवडताना संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत बैठक घेण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी दिले. या प्रश्नाच्या चर्चे दरम्यान कोकणावर अन्याय होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. यावर, कोकणातील चार नद्यांचे पुनर्जीवन करण्यात येणार असून त्यासाठी १३ कोटी २१ लाख रुपये प्रस्तावित असल्याचे शिंदे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील गांधारी, रत्नागिरीतील जगबुडी, सावित्री आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील जानवली या चार नद्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)>२५ हजार शेततळ्याचे काम पूर्ण ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत आतापर्यंत २५ हजाराहून अधिक शेततळी पूर्ण करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.>हिमोफेलिया रुग्णांवर औषधोपचारजलयुक्त शिवार योजनेतील निधी अखर्चित राहिला असला तरी शिवारअंतर्गत गेल्या वर्षी २०,०१५ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत १३, ५८२ कामे पूर्ण झाली आहेत. तर, ६,४३३ कामे प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे शिंदे यांनी दिली.मागेल त्याला शेततळे योजनेसाठी एकूण ९६ हजार ७७४ इतक्या लोकांनी मागणी केली होती. त्यापैकी २५ हजार ९०३ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळे योजनेचा लाभ सर्व इच्छुक शेतक-यांना घेता यावा यासाठी ५० पैसे आणेवारीची अट शिथिल करुन ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे, असे मंत्री रावल यांनी सांगितले.