शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

जलयुक्त शिवारसाठी स्वतंत्र प्राधिकरण

By admin | Updated: April 7, 2017 05:50 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली.

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली.यावर्षी जलयुक्त शिवार योजनेतील निधी अखर्चित राहिला आहे. याबाबत भाजपाचे परिणय फुके यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. पाऊस आणि निवडणूक आचारसंहितेमुळे काही कामे उशिराने सुरू झाली. एकूण २१ कोटी १४ लाख रुपयांचा निधी अखर्चिक राहिला होता; मात्र तो मार्चअखेरीला खर्च करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गेल्या वर्षी २०,०१५ कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी १३, ५८२ कामे पूर्ण झाली आहेत. तर, ६,४३३ कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.जलयुक्त शिवारसाठी गावे निवडताना संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत बैठक घेण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी दिले. या प्रश्नाच्या चर्चे दरम्यान कोकणावर अन्याय होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. यावर, कोकणातील चार नद्यांचे पुनर्जीवन करण्यात येणार असून त्यासाठी १३ कोटी २१ लाख रुपये प्रस्तावित असल्याचे शिंदे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील गांधारी, रत्नागिरीतील जगबुडी, सावित्री आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील जानवली या चार नद्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)>२५ हजार शेततळ्याचे काम पूर्ण ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत आतापर्यंत २५ हजाराहून अधिक शेततळी पूर्ण करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.>हिमोफेलिया रुग्णांवर औषधोपचारजलयुक्त शिवार योजनेतील निधी अखर्चित राहिला असला तरी शिवारअंतर्गत गेल्या वर्षी २०,०१५ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत १३, ५८२ कामे पूर्ण झाली आहेत. तर, ६,४३३ कामे प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे शिंदे यांनी दिली.मागेल त्याला शेततळे योजनेसाठी एकूण ९६ हजार ७७४ इतक्या लोकांनी मागणी केली होती. त्यापैकी २५ हजार ९०३ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळे योजनेचा लाभ सर्व इच्छुक शेतक-यांना घेता यावा यासाठी ५० पैसे आणेवारीची अट शिथिल करुन ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे, असे मंत्री रावल यांनी सांगितले.