शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

प्रचाराकडे मजुरांचा वाढता कल

By admin | Updated: October 10, 2014 00:58 IST

हमखास चांगली कमाई होत असल्याने नाका कामगारांचा कल निवडणूक प्रचाराकडे वाढला आहे. याचा परिणाम मात्र नाका ओस पडून मजुरांचा तुटवडा निर्माण होण्यात झाला आहे

चिकणघर : हमखास चांगली कमाई होत असल्याने नाका कामगारांचा कल निवडणूक प्रचाराकडे वाढला आहे. याचा परिणाम मात्र नाका ओस पडून मजुरांचा तुटवडा निर्माण होण्यात झाला आहे. यामुळे कल्याणात किरकोळ कामांसाठीही मजूर मिळेनासे झाले आहेत.सध्या नाक्यावर पुरुष मजुराला ४५० तर स्त्री मजुरास ३५० रु. प्रतिदिन रोजगाराचे दर आहेत. मात्र, हा रोजगार सलग नसतो. परंतु, निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून संपेपर्यंत प्रचार आणि सभांसाठी पुरुषाला ३०० तर स्त्री मजुरास २०० रुपये तासाला मिळतात. हा रोजगार किमान १०-१२ दिवस सलग असतो. याशिवाय चहा, नाश्ता, जेवण, टोप्या मिळतात. प्रचार रॅलीला आणि नेत्यांच्या सभांना तीन ते चार तास सहज लागतात. तासावरचा रोजगार मजुरांच्या पथ्यावरच पडत असल्याने मजुरांचे निवडणूक प्रचाराला आकर्षण वाढले आहे. सर्वच पक्ष स्वबळावर ही निवडणूक लढवत असल्याने प्रचार रॅली किंवा सभांसाठी गर्दीची आवश्यकता असतेच. यासाठी मजुरांशिवाय पर्याय राहिलेला नाही.संगणकाचे ज्ञान असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांनाही आपापल्या क्षमतेनुसार निवडणूक प्रचारात रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रचारात सोशल नेटवर्किंगचा प्रभाव वाढल्याने संगणकतज्ज्ञांना मागणीही वाढली आहे. रिक्षावाल्यांनाही प्रतिदिन एक हजार मिळत आहेत. तीच माणसे, त्याच रिक्षा, त्याच पक्षनिहाय घोषणा, मात्र टोप्या आणि झेंडे वेगवेगळे असल्याचे चित्र कल्याणमध्ये तरी दिसत आहे. परिणामी, कल्याणातील शिवाजी चौक आणि खडकपाडा येथील दोन्ही मजुरांचे नाके ओस पडल्याचे बघायला मिळत आहे. (वार्ताहर)