शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

सागरी गस्तीमध्ये वाढ

By admin | Updated: September 24, 2016 02:17 IST

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर उरण येथे संशयित दहशतवादी दिसल्याच्या चर्चेने मुंबईसह नवी मुंबईच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर उरण येथे संशयित दहशतवादी दिसल्याच्या चर्चेने मुंबईसह नवी मुंबईच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याकरिता नवी मुंबईला १०४ किमीचा सागरी किनारा लाभलेला असून, त्याचीही गस्त वाढवण्यात आली आहे. याकरिता सागरी पोलिसांबरोबरच सीआरपीएफ यांच्यातर्फे बोटीने गस्त घालण्यात येत आहे.दहा महिन्यांपूर्वी उरण परिसरात काडतुसे असलेली पेटी आढळली होती. त्यानंतर गुरुवारी संशयित दहशतवादी घुसल्याच्या चर्चेने उरण पुन्हा चर्चेत आले आहे. हे संशयित दहशतवादी समुद्रामार्गे घुसल्याची शक्यता असल्याने गस्त घालण्यासाठी सागरी पोलिसांच्या सात बोटी किनाऱ्यावर गस्त घालत आहेत. त्यांच्याकडून शहराच्या संपूर्ण किनारपट्ट्या, जेट्टींचीही पाहणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप त्यांनाही संशयास्पद काहीच आढळलेले नाही. याकामी पोलिसांच्या मदतीला सागरी सुरक्षा दल, मच्छीमार बांधवही धावून आलेले आहेत. त्यांच्याकडून देखील सागरी किनारी भागावर लक्ष ठेवले जात आहे. अनेक मच्छीमार बांधवांच्या बैठका घेवून त्यांच्याकडेही चौकशी करण्यात आलेली आहे. परंतु त्या दोन विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर कोणीच संशयित दहशतवादी पाहिलेले नाहीत. शिवाय दोन दिवसांत पोलिसांनी संपूर्ण उरण शहर व लगतचा भाग पिंजून काढलेला आहे. जर दहशतवादी असते तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कोम्ब्ािंग आॅपरेशनमध्ये आढळून आले असते, अशी शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे पोलिसांव्यतिरिक्त उरणमध्ये आलेली फौज परत पाठवण्यात आली असून आवश्यकता भासल्यास त्यांना बोलावले जाणार आहे.>उरणमध्ये संशयित दहशतवादी घुसल्याच्या शक्यतेवरून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची सागरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सागरी किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी ७ बोटी कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामार्फत जेट्टीच्या ठिकाणांची देखील देखरेख करण्यात येत आहे. - नितीन पवार, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा.