शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

राज्यात पावसाचा जोर वाढला

By admin | Updated: July 1, 2016 04:08 IST

कोकणासह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणासह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर वगळता पश्चिम महाराष्ट्रात मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येत्या ४८ तासांत कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर जास्त आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. बल्लारपूर येथे सर्वाधिक २३० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यात हिंगोलीआणि नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर होता. दमदार पावसाने नद्या-ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यापाठोपाठ विदर्भात राजुरा येथे २२०, तर कोकणात कणकवलीमध्ये १४०, हर्णे, पोंभुर्णा येथे ११०, मुरूड येथे १०० मिमी पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाला. शहरात पावसाचा जोर चांगला होता. गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतही दिवसभरात दमदार पाऊस झाला. विशेषत: ठाणे, नवी मुंबई परिसरात जोरदार सरी बरसल्या. (प्रतिनिधी)>गेल्या २४ तासांतील राज्यातील पाऊस (मिमीमध्ये) : बल्लारपूर २३०, राजुरा २२०, कणकवली १४०, सेलू १२०, हर्णे, पोंभुर्णा ११०, मुरूड १००, दापोली, गुहाघर, खेड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, वसमत ९०, देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला, भद्रावती, चामोर्शी, पांढरकेवडा, वरोरा ८०, पालघर, राजापूर, किनवट, देवळी, कोपर्ना ७०, संगमेश्वर, श्रीवर्धन, गगनबावडा, हिंगोली, जिंतूर, चंद्रपूर ६०, चिपळूण, रोहा, आजरा, महाबळेश्वर, नांदगाव, राधानगरी, अंबड, हादगाव, हिमायतनगर, अंजनगाव, बार्शी, भामरागड, चांदूर, शिंहेवाडी, वणी ५०, भिरा, चंदगड, महूर, नांदेड, दर्यापूर, उमरखेड, यवतमाळ ४०. >वीज पडून मृत्यूतलावात दुचाकी धुण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विद्यार्थ्याचा गुरुवारी वीज पडून मृत्यू झाला. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी (ता. एटापल्ली) येथे दुपारी ३च्या सुमारास घडली. मीरवा दुलसा लेकामी (रा. हेडरी) असे त्याचे नाव आहे. तो पंदेवाही येथील विनोबा आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकत होता.>नांदेडमध्ये पुरात अडकलेल्या चौघांची सुटका नांदेड औंढा व वसमत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने आसना नदीला पूर आला आहे. सांगवी बंधारा येथील पंप हाउसला पाण्याने वेढा दिल्याने पुरात महापालिकेचे चार पंप आॅपरेटर अडकून पडले होते.आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सात तासांनंतर त्यांची सुखरूप सुटका केली. विष्णुपुरी जलाशयाची पाणीपातळी खालावल्याने अर्ध्या नांदेड शहराला सांगवी येथील पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी सोडण्यात येत आहे़