शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिल्लोडमध्ये मतदानाची वाढलेली टक्केवारी ठरणार 'गेमचेंजर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 15:48 IST

सत्तांतर होणार अशा वेळी नेहमीच मतदानाची टक्केवारी वाढते, असा समज आहे. तसं असेल तर ही सत्तारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याउलट वाढलेली टक्केवारी सत्तारांच्या पथ्यावर पडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुंबई - मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून विधानसभेत सिल्लोड मतदार संघाचे  प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार अब्दुल सत्तारांनी भूमिका बदलून शिवसेनेत प्रवेश केला. एवढच नाही तर शिवसेनेकडून निवडणूकही लढवली. परंतु, सत्तार यांच्यासाठी यावेळची निवडणूक काहीशी खडतर ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात चाललेला 'ट्रॅक्टर फॅक्टर' आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी सत्तारांचा घोर वाढवणारी ठरू शकते.  

लोकसभा निवडणुकीच्या वेळी सत्तार यांनी बंडखोरी करत भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले होते. परंतु, सिल्लोडमधील भाजप नेत्यांच्या विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांना शिवसेनेत पाठविण्याचे नियोजन केले. मात्र यामुळे शिवसैनिक काही प्रमाणात नाराज झाले. तर भाजप नेत्यांनी देखील सत्तार यांना रोखण्यासाठी ताकद पणाला लावली. त्याचवेळी काँग्रेसने याचा फायदा घेण्यासाठी प्रभाकर पलोदकर यांना दिलेले तिकीट बदलून मुस्लीम उमेदवार दिला. तर पालोदर अपक्ष रिंगणात उतरले.

शिवसेनेत एकाकी पडलेल्या सत्तारांना घेरण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आले. त्यातच लोकसभा निवडणुकीत चाललेला ट्रॅक्टर फॅक्टर सिल्लोडमध्ये महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. पालोदकर यांच्यामागे मराठा मतदार उभे राहण्याची शक्यता आहे. तर मुस्लीम मतदार सत्तारांना साथ देण्यावरून संभ्रमअवस्थेत आहे. ही बाब सत्तारांचे टेन्शन वाढवणारी आहे.

दरम्यान सिल्लोड मतदार संघाने यावेळी मतदानाच्या टक्केवारीत याआधीचे विक्रम मोडीत काढले आहे. मतदार संघात तब्बल 73 टक्के मतदान झाले. सत्तांतर होणार अशा वेळी नेहमीच मतदानाची टक्केवारी वाढते, असा समज आहे. तसं असेल तर ही सत्तारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याउलट वाढलेली टक्केवारी सत्तारांच्या पथ्यावर पडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.