शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘ई-गव्हर्नन्स’चा वापर वाढवा!

By admin | Updated: June 30, 2014 00:42 IST

‘राज्यातील अनेक विद्यापीठांतील शिक्षणाचा दर्जा खालावला असल्याची सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिवाय, अनेक महाविद्यालयांत नियमित शिक्षक, सोयीसुविधा इत्यादींची वानवा आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूचना : महाविद्यालयांमधील गुणात्मक सुधारणांसाठी पुढाकार योगेश पांडे - नागपूर‘राज्यातील अनेक विद्यापीठांतील शिक्षणाचा दर्जा खालावला असल्याची सातत्याने टीका करण्यात येत आहे. शिवाय, अनेक महाविद्यालयांत नियमित शिक्षक, सोयीसुविधा इत्यादींची वानवा आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांत गुणात्मक वाढ होणे अपेक्षित आहे. हीच बाब लक्षात घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व महाविद्यालयांमधील गुणवत्ता वाढीसाठी पुढाकार घेतला आहे. संस्थांनी कार्यालयीन कामकाजासाठी पारंपरिक पद्धत सोडून ‘ई-गव्हर्नन्स’चा प्रभावी वापर करावा तसेच संस्थेची इत्थंभूत माहिती संकेतस्थळावर सादर करावी, असे निर्देश संचालनालयातर्फे देण्यात आले आहेत. राज्यातील महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ शिक्षणात सुधारणा करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव, उपसचिव, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिव उपस्थित होते. बैठकीत उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यात महाविद्यालयांमध्ये नियमित शिक्षकांची कमतरता, सोयीसुविधांचा अभाव इत्यादी मुद्यांवर सखोल विचार झाला.बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व संलग्नित पदवी व पदव्युत्तर संस्थांना तातडीचे पत्र लिहिले आहे. संस्थांच्या नियंत्रणासाठी तसेच अन्य कार्यालयीन कामकाजासाठी ‘ई-गव्हर्नन्स’चा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सर्व महाविद्यालयांनी शिक्षकांची माहिती सादर करण्याचे म्हटले आहे़ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजुरी, भरलेल्या व रिक्त पदांची संख्या, महाविद्यालयात उपलब्ध सोयीसुविधा, तक्रार निवारणासाठीची उपाययोजना यासंदर्भातील विस्तृत माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय, महाविद्यालय ज्या विद्यापीठाशी संलग्नित असेल, त्याच्या संकेतस्थळावरदेखील उपरोक्त माहिती अपलोड करण्यात यावी, असे पत्रात नमूद केले आहे.