शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

फळपीक विमा योजनेची मुदत वाढवा

By admin | Updated: November 11, 2016 05:39 IST

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका सामान्य शेतकऱ्यांनाही बसत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी

मुंबई : ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका सामान्य शेतकऱ्यांनाही बसत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी असल्याने, फळपीक विमा भरण्याची मुदत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची मागणी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे यांनी गुरुवारी केली. फळपीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत १० नोव्हेंबर रोजी संपली आहे. मात्र, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्याने शेवटच्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना विमा हफ्ता भरण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना विम्याचा हफ्ता भरता आला नाही. विम्याचे पैसे मुदतीत भरता न आल्यास शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळू शकणार नाही. द्राक्ष, केळी, डाळिंब, आंबा या फळबागांना विम्याचे संरक्षण न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पुढील काही दिवस वैध नोटांचा तुटवडा कायम राहणार असल्याने फळपीक विमा भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. मागील पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना १० हजारांपर्यंतची रक्कम मिळणार असल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांच्या हातावर दीड-दोन हजारांची रक्कम टेकविण्यात आली. शेतकऱ्यांकडून विम्याचा हफ्ता घेऊनही शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली सुरू झालेली योजना प्रत्यक्षात विमा कंपन्यांच्या हिताची ठरत आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने योग्य पावले उचलावित, अशी मागणीही वाघमारे यांनी केली. (प्रतिनिधी)