शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

शिक्षेचे प्रमाण वाढले, वेतनही वाढवा हो!

By admin | Updated: July 6, 2014 00:42 IST

विधी सल्लागारांच्या येण्याने पोलिसांना कायदेशीर ज्ञानाचे बळ मिळाले, त्यांची दोषारोपपत्रे बिनचूक जाऊ लागली, पर्यायाने खटल्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढले. परंतु त्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विधी

विधी सल्लागारांचा टाहो : राज्यात साडेतीनशेवर पदे रिक्तराजेश निस्ताने - यवतमाळविधी सल्लागारांच्या येण्याने पोलिसांना कायदेशीर ज्ञानाचे बळ मिळाले, त्यांची दोषारोपपत्रे बिनचूक जाऊ लागली, पर्यायाने खटल्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढले. परंतु त्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विधी सल्लागारांचे वेतन मात्र आठ वर्षांपासून जैसे थेच आहे. सत्र न्यायालय आणि प्रथम श्रेणी न्यायालयांमध्ये चालणाऱ्या फौजदारी खटल्यात शिक्षेचे प्रमाण दहा वर्षांपूर्वी नगण्य होते. पोलिसांची सदोष दोषारोपपत्रे, सरकारी पक्ष-पोलीस-पंच साक्षीदारांमध्ये समन्वयाचा अभाव आदी बाबी त्यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या. म्हणून सन २००६ पासून विधी सल्लागार आणि विधी निर्देशक ही दोन पदे निर्माण करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात विधी सल्लागार तर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विधी निर्देशक बसविले गेले. कोणत्याही गुन्ह्याचे दोषारोपपत्र या विधी अधिकाऱ्यांच्या नजरे खालून जाऊ लागले. त्यातील चुका दुरुस्त होऊ लागल्या. त्याचा चांगला परिणाम न्यायालयीन खटल्यातील शिक्षेच्या प्रमाणावर दिसू लागला. न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढण्यासोबतच फिर्यादी पक्षाला न्याय मिळावा यासाठी विधी सल्लागार झटताना दिसतात. परंतु आता या सल्लागारांवरच अन्याय होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. गेल्या आठ वर्षांपासून या सल्लागारांच्या वेतनात शासनाने एक रुपयाचीही वाढ केलेली नाही. सर्वत्र विनवण्या करूनही या सल्लागारांचा ना पगार वाढला ना कायम नियुक्ती मिळाली. पर्यायाने अनेक सल्लागार हे पद सोडून निघून गेले. राज्यात विधी सल्लागारांची ४७१ पदे मंजूर आहेत. आजच्या घडीला त्यातील केवळ शंभर-सव्वाशे पदे भरलेली आहेत. उर्वरित साडेतीनशेवर पदे रिक्त आहे. त्यात नागपूर, औरंगाबाद परिक्षेत्रात सर्वाधिक आहेत. ‘नियमित करा अथवा पगारवाढ द्या’ या मागण्यांना शासन प्रतिसाद देत नसल्याचे पाहून काही विधी सल्लागारांनी ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) धाव घेतली. तेथे या सल्लागारांच्या बाजूने निकाल लागला. म्हणून शासनाने ‘मॅट’च्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथेही ‘मॅट’चा निकाल उचलून धरताना विधी सल्लागारांना दिलासा दिला गेला. आता शासनाने त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना शासनाने विधी सल्लागारांना नियमित करण्यासंबंधी सध्या कोणतेही धोरण नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले. तर दुसरीकडे सेवा प्रवेश नियमावली तयार करून त्यात सलग पाच वर्षे सेवा झालेल्या व्यक्तीला कायम नियुक्ती देता येईल, अशी तरतूद केली. या प्रकरणात आता १ आॅगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमच्या परिश्रमामुळे खटल्यातील शिक्षेचे प्रमाण वाढले असताना आमच्या वेतनात वाढ का नाही, हा राज्यातील तमाम विधी सल्लागारांचा एकमुखी सवाल आहे.