शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

वृक्ष लावणाऱ्या हातांची संख्या वाढवा

By admin | Updated: July 5, 2017 04:10 IST

महाराष्ट्रात मराठवाडा विभागात सर्वांत कमी जंगल शिल्लक राहिले आहे. हा परिसर हिरवागार करण्यासाठी वृक्षलागवड गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद (जि. औरंगाबाद) : महाराष्ट्रात मराठवाडा विभागात सर्वांत कमी जंगल शिल्लक राहिले आहे. हा परिसर हिरवागार करण्यासाठी वृक्षलागवड गरजेची आहे. सध्या वृक्षारोपण हा सरकारी उपक्रम राहिला नसून, एक लोकचळवळ झाली आहे. त्यामुळे झाडे कापणाऱ्या हातांपेक्षा झाडे लावणाऱ्यांची संख्या वाढवा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.दौलताबादजवळील अब्दीमंडी गावाच्या वनक्षेत्रातील ६५ हेक्टर क्षेत्रावर संरक्षण मंत्रालय व राज्य वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्यातील पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनचा शुभारंभ तसेच ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंर्तगत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी यावेळी ते बोलत होते.मंगळवारपर्यंत राज्यात २ कोटी १९ लक्ष १५ हजार २९६ वृक्षलागवड झाली आहे. औरंगाबाद विभागामध्येही ४५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून ते लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वनविभागाने हॅलो फॉरेस्ट १९२६ हा टोल फ्री नंबर सुरू केला असून, कुठेही अवैध वृक्षतोड किंवा वन्यप्राण्यांची कत्तल होत असेल, तर या नंबरवर संपर्क साधल्यास वन विभाग त्वरित कारवाई करील, अशी माहिती वनमंत्र्यांनी यावेळी दिली.बुके नव्हे, रोप भेट द्यावन विभागाने यानंतर कुठल्याही कार्यक्रमात पुष्पगुच्छ किंवा बुके न देण्याची संकल्पना आणली असून, पुष्पगुच्छऐवजी वृक्षाचे रोप किंवा वन विभागाशी संबंधित पुस्तक द्यावे, अस आवाहन मुनगंटीवार यांनी केले.मराठवाड्यात केवळ४.९० टक्के वनक्षेत्रमराठवाड्यात सध्या केवळ ४.९० टक्के वनक्षेत्र आहे. औरंगाबादसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील वन परिक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात लष्कराच्या मदतीने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.