शहरं
Join us  
Trending Stories
1
उरफाटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
2
"त्याला कशाला दोष देता?"; सुनील गावसकरांनी घेतली गौतम गंभीरची बाजू, दोषी कोण तेही सांगितलं
3
एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट
4
लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले...
5
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
6
"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
7
बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!
8
“OBC आरक्षणावरील टांगती तलवार कायम; भाजपा सरकारने दिशाभूल केली”; विजय वडेट्टीवारांची टीका
9
Meesho IPO: ₹२.८४ कोटींचे होणार ₹५२४५ कोटी; Meesho IPO बदलणार 'या' लोकांचं नशीब
10
Deepika TC : "फेकलेली फळं खाऊन..."; शेतमजूर बापाची लेक वर्ल्ड चॅम्पियन, दीपिका टीसीचा संघर्षमय प्रवास
11
Datta Jayanti 2025: 'दत्त येवोनिया उभा ठाकला' हा अनुभव तुम्हालाही येईल, 'अशी' घाला आर्त साद!
12
संपत्ती लपवणाऱ्यांना आयकर विभागाचा दंडुका; विदेशी संपत्ती लपवणारे २५ हजार करदाते ‘रडार’वर
13
“राज्याची तिजोरी जनतेचीच; शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणींसाठीच खर्च होणार”: एकनाथ शिंदे
14
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
15
SMAT 2025 : प्रितीच्या संघातील पठ्ठ्याचा स्फोटक अवतार! शाहरुखच्या मिस्ट्री स्पिनरची धुलाई (VIDEO)
16
SMAT: मध्य प्रदेश जिंकलं, पण चर्चा वेंकटेश अय्यरची; बिहारच्या संघाला दाखवला हिसका!
17
Gurucharitra Parayan: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत श्रीगुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
18
पैसा तिप्पट करणारी गुंतवणूक! 'या' ५ म्युच्युअल फंडांनी ३ वर्षांत दिले ३१% पेक्षा जास्त रिटर्न!
19
VIDEO: तरुणाने उंचावरून घेतली उडी, पण वेळेवर पॅराशूट उघडलंच नाही, त्यापुढे जे झालं....
20
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लावणाऱ्या हातांची संख्या वाढवा

By admin | Updated: July 5, 2017 04:10 IST

महाराष्ट्रात मराठवाडा विभागात सर्वांत कमी जंगल शिल्लक राहिले आहे. हा परिसर हिरवागार करण्यासाठी वृक्षलागवड गरजेची

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद (जि. औरंगाबाद) : महाराष्ट्रात मराठवाडा विभागात सर्वांत कमी जंगल शिल्लक राहिले आहे. हा परिसर हिरवागार करण्यासाठी वृक्षलागवड गरजेची आहे. सध्या वृक्षारोपण हा सरकारी उपक्रम राहिला नसून, एक लोकचळवळ झाली आहे. त्यामुळे झाडे कापणाऱ्या हातांपेक्षा झाडे लावणाऱ्यांची संख्या वाढवा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.दौलताबादजवळील अब्दीमंडी गावाच्या वनक्षेत्रातील ६५ हेक्टर क्षेत्रावर संरक्षण मंत्रालय व राज्य वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनक्षेत्र वाढविण्यासाठी राज्यातील पहिल्या इको टास्क फोर्स बटालियनचा शुभारंभ तसेच ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंर्तगत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी यावेळी ते बोलत होते.मंगळवारपर्यंत राज्यात २ कोटी १९ लक्ष १५ हजार २९६ वृक्षलागवड झाली आहे. औरंगाबाद विभागामध्येही ४५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून ते लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वनविभागाने हॅलो फॉरेस्ट १९२६ हा टोल फ्री नंबर सुरू केला असून, कुठेही अवैध वृक्षतोड किंवा वन्यप्राण्यांची कत्तल होत असेल, तर या नंबरवर संपर्क साधल्यास वन विभाग त्वरित कारवाई करील, अशी माहिती वनमंत्र्यांनी यावेळी दिली.बुके नव्हे, रोप भेट द्यावन विभागाने यानंतर कुठल्याही कार्यक्रमात पुष्पगुच्छ किंवा बुके न देण्याची संकल्पना आणली असून, पुष्पगुच्छऐवजी वृक्षाचे रोप किंवा वन विभागाशी संबंधित पुस्तक द्यावे, अस आवाहन मुनगंटीवार यांनी केले.मराठवाड्यात केवळ४.९० टक्के वनक्षेत्रमराठवाड्यात सध्या केवळ ४.९० टक्के वनक्षेत्र आहे. औरंगाबादसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील वन परिक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात लष्कराच्या मदतीने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.