शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

कामगार रुग्णालयांची संख्या वाढवू

By admin | Updated: May 29, 2017 03:15 IST

कामगार रुग्णालयात कॅन्सर, किडनी, हृदयरोग असे स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहेत. ईएसआयसीचा इन्श्युरन्स घेतलेला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कामगार रुग्णालयात कॅन्सर, किडनी, हृदयरोग असे स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहेत. ईएसआयसीचा इन्श्युरन्स घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा आमच्यासाठी अतिमहत्त्वाचा आहे. पुण्यात ३ लाख लाभधारक असून, त्यांना २४ तास वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. राज्यातील कामगार रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एक हजार कोटीची तरतूद केली जाणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिले. बिबवेवाडी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयाचे (ईएसआयसी) नूतनीकरण आणि श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. सध्या असलेले ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांचे करण्यात येणार असून उद्घाटन बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, नगरसेविका अनुसया चव्हाण, मानसी देशपांडे, केंद्रीय कामगार सचिव एम. सत्यवती आदी उपस्थित होते. दत्तात्रय म्हणाले, ‘‘नवीन रुग्णालयांसाठी महाराष्ट्रातून दहा प्रस्ताव आले आहेत. नवीन ईएसआयसी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्यातून दहा प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून रांजणगाव व हिंजवडीसाठी येथून प्रत्येकी १०० बेड, चाकणसाठी १५० बेड तर बारामतीसाठी ३० बेड रुग्णालयांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्याचबरोबर शिरवळ, सातारा येथून प्रत्येकी ३० बेड, पनवेल, खारघर, बेलापूर येथून प्रत्येकी १०० बेड तर वाशीमधून १५० बेडची नवीन रुग्णालये उभी करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे प्रस्ताव आले आहेत. ही रुग्णालये मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य सेवेवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.’’राज्य सरकार अपयशीकेंद्र शासनाने महाराष्ट्रातील दोन कर्मचारी विमा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याची योजना आखली आहे. यामध्ये पुण्यातील बिबवेवाडी तर कोल्हापूर येथील ईएसआयसी रुग्णालयांचा समावेश आहे. बिबवेवाडी व कोल्हापूर येथील रुग्णालये राज्य सरकारला चालवायला दिले होते. मात्र, राज्य सरकार अपयशी ठरल्याने दोन्ही रुग्णालये केंद्र शासनाने ताब्यात घेतली असून, त्यांच्याद्वारे चालवण्यात येणार आहेत. आमदार माधुरी मिसाळ नाराजबिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयाला राज्य सरकारने जागा दिली. हे रुग्णालय चांगल्या प्रकारे चालावे यासाठी आमदार माधुरी मिसाळ प्रयत्नशील होत्या. मुख्यमंत्र्यानीही तसे आश्वासन दिले होते. परंतु, हे हॉस्पिटल केंद्र सरकारने ताब्यात घेतल्यानंतर अचानक उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याबद्दल स्थानिक नेते आणि मुख्यमंत्र्यांनाही कळविण्यात आले नाही. याबाबत माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रम स्थळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. आमंत्रण न दिल्याने मुख्यमंत्री अथवा आरोग्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयात डॉक्टर नसल्याने कोणतेच वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या केंद्र आणि राज्य नेत्यांमधे समन्वय नसल्याचे यातून समोर येत आहे.