शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

कामगार रुग्णालयांची संख्या वाढवू

By admin | Updated: May 29, 2017 03:15 IST

कामगार रुग्णालयात कॅन्सर, किडनी, हृदयरोग असे स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहेत. ईएसआयसीचा इन्श्युरन्स घेतलेला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कामगार रुग्णालयात कॅन्सर, किडनी, हृदयरोग असे स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहेत. ईएसआयसीचा इन्श्युरन्स घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा आमच्यासाठी अतिमहत्त्वाचा आहे. पुण्यात ३ लाख लाभधारक असून, त्यांना २४ तास वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. राज्यातील कामगार रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एक हजार कोटीची तरतूद केली जाणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिले. बिबवेवाडी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयाचे (ईएसआयसी) नूतनीकरण आणि श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. सध्या असलेले ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांचे करण्यात येणार असून उद्घाटन बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, नगरसेविका अनुसया चव्हाण, मानसी देशपांडे, केंद्रीय कामगार सचिव एम. सत्यवती आदी उपस्थित होते. दत्तात्रय म्हणाले, ‘‘नवीन रुग्णालयांसाठी महाराष्ट्रातून दहा प्रस्ताव आले आहेत. नवीन ईएसआयसी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्यातून दहा प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून रांजणगाव व हिंजवडीसाठी येथून प्रत्येकी १०० बेड, चाकणसाठी १५० बेड तर बारामतीसाठी ३० बेड रुग्णालयांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्याचबरोबर शिरवळ, सातारा येथून प्रत्येकी ३० बेड, पनवेल, खारघर, बेलापूर येथून प्रत्येकी १०० बेड तर वाशीमधून १५० बेडची नवीन रुग्णालये उभी करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे प्रस्ताव आले आहेत. ही रुग्णालये मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य सेवेवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.’’राज्य सरकार अपयशीकेंद्र शासनाने महाराष्ट्रातील दोन कर्मचारी विमा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याची योजना आखली आहे. यामध्ये पुण्यातील बिबवेवाडी तर कोल्हापूर येथील ईएसआयसी रुग्णालयांचा समावेश आहे. बिबवेवाडी व कोल्हापूर येथील रुग्णालये राज्य सरकारला चालवायला दिले होते. मात्र, राज्य सरकार अपयशी ठरल्याने दोन्ही रुग्णालये केंद्र शासनाने ताब्यात घेतली असून, त्यांच्याद्वारे चालवण्यात येणार आहेत. आमदार माधुरी मिसाळ नाराजबिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयाला राज्य सरकारने जागा दिली. हे रुग्णालय चांगल्या प्रकारे चालावे यासाठी आमदार माधुरी मिसाळ प्रयत्नशील होत्या. मुख्यमंत्र्यानीही तसे आश्वासन दिले होते. परंतु, हे हॉस्पिटल केंद्र सरकारने ताब्यात घेतल्यानंतर अचानक उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याबद्दल स्थानिक नेते आणि मुख्यमंत्र्यांनाही कळविण्यात आले नाही. याबाबत माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रम स्थळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. आमंत्रण न दिल्याने मुख्यमंत्री अथवा आरोग्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयात डॉक्टर नसल्याने कोणतेच वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या केंद्र आणि राज्य नेत्यांमधे समन्वय नसल्याचे यातून समोर येत आहे.