शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कामगार रुग्णालयांची संख्या वाढवू

By admin | Updated: May 29, 2017 03:15 IST

कामगार रुग्णालयात कॅन्सर, किडनी, हृदयरोग असे स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहेत. ईएसआयसीचा इन्श्युरन्स घेतलेला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कामगार रुग्णालयात कॅन्सर, किडनी, हृदयरोग असे स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहेत. ईएसआयसीचा इन्श्युरन्स घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा आमच्यासाठी अतिमहत्त्वाचा आहे. पुण्यात ३ लाख लाभधारक असून, त्यांना २४ तास वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. राज्यातील कामगार रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एक हजार कोटीची तरतूद केली जाणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिले. बिबवेवाडी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयाचे (ईएसआयसी) नूतनीकरण आणि श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. सध्या असलेले ५० खाटांचे रुग्णालय १०० खाटांचे करण्यात येणार असून उद्घाटन बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, नगरसेविका अनुसया चव्हाण, मानसी देशपांडे, केंद्रीय कामगार सचिव एम. सत्यवती आदी उपस्थित होते. दत्तात्रय म्हणाले, ‘‘नवीन रुग्णालयांसाठी महाराष्ट्रातून दहा प्रस्ताव आले आहेत. नवीन ईएसआयसी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्यातून दहा प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून रांजणगाव व हिंजवडीसाठी येथून प्रत्येकी १०० बेड, चाकणसाठी १५० बेड तर बारामतीसाठी ३० बेड रुग्णालयांचे प्रस्ताव आलेले आहेत. त्याचबरोबर शिरवळ, सातारा येथून प्रत्येकी ३० बेड, पनवेल, खारघर, बेलापूर येथून प्रत्येकी १०० बेड तर वाशीमधून १५० बेडची नवीन रुग्णालये उभी करण्यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे प्रस्ताव आले आहेत. ही रुग्णालये मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य सेवेवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे.’’राज्य सरकार अपयशीकेंद्र शासनाने महाराष्ट्रातील दोन कर्मचारी विमा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याची योजना आखली आहे. यामध्ये पुण्यातील बिबवेवाडी तर कोल्हापूर येथील ईएसआयसी रुग्णालयांचा समावेश आहे. बिबवेवाडी व कोल्हापूर येथील रुग्णालये राज्य सरकारला चालवायला दिले होते. मात्र, राज्य सरकार अपयशी ठरल्याने दोन्ही रुग्णालये केंद्र शासनाने ताब्यात घेतली असून, त्यांच्याद्वारे चालवण्यात येणार आहेत. आमदार माधुरी मिसाळ नाराजबिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयाला राज्य सरकारने जागा दिली. हे रुग्णालय चांगल्या प्रकारे चालावे यासाठी आमदार माधुरी मिसाळ प्रयत्नशील होत्या. मुख्यमंत्र्यानीही तसे आश्वासन दिले होते. परंतु, हे हॉस्पिटल केंद्र सरकारने ताब्यात घेतल्यानंतर अचानक उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याबद्दल स्थानिक नेते आणि मुख्यमंत्र्यांनाही कळविण्यात आले नाही. याबाबत माधुरी मिसाळ यांनी कार्यक्रम स्थळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. आमंत्रण न दिल्याने मुख्यमंत्री अथवा आरोग्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या रुग्णालयात डॉक्टर नसल्याने कोणतेच वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या केंद्र आणि राज्य नेत्यांमधे समन्वय नसल्याचे यातून समोर येत आहे.