शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक

By अतुल कुलकर्णी | Updated: August 24, 2017 16:39 IST

ओबीसींची क्रिमीलेयरची मर्यादा वाढविल्यानंतर आता राष्टÑवादीने नवीन मागणी पुढे केली आहे.

मुंबई - केंद्र सरकारने ज्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गासाठी क्रिमिलेअर मर्यादा सहा लाखावरुन आठ लाख केली. याप्रमाणेच एपीएलसाठी (केशरी कार्डधारक) असलेली एक लाखाची मर्यादा दोन लाख करावी तसेच प्राधान्य गटासाठी (पिवळे कार्डधारक) ग्रामीण भागात ४४ हजार तसेच शहरी भागात ५९ हजारांची उत्पन्न मर्यादा वाढवून एक लाख करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

ओबीसी प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचे स्वागत करत आहे. सध्या महागाईने सर्वच ठिकाणी टोक गाठलेले आहे. आरोग्य, स्वयंरोजगार अशा विविध शासकीय योजनांसाठी पिवळे व केशरी रेशनकार्डसाठी असलेली उत्पन्न मर्यादा हाच निकष लावला जातो. ही उत्पन्न मर्यादा कमी असल्यामुळे निम्न मध्यम वर्गातील नागरिक या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. महागाई वाढली असताना आज प्राधान्य गटासाठी (पिवळे कार्डाधारक) शहरी आणि ग्रामीण अशी उत्पन्नाची विभागणी न करता दोन्ही ठिकाणी सरसकट एकच निकष लावून ही मर्यादा वाढवावी. केंद्राने ज्याप्रमाणे ओबीसींची क्रिमिलेअर मर्यादा वाढवली त्याप्रमाणेच रेशन कार्ड धारकांची उत्पन्न मर्यादा वाढवावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी