शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

धरणातील साठा वाढता वाढेना...

By admin | Updated: July 14, 2017 01:32 IST

जून महिन्याच्या सुरुवातीला भोर तालुक्यासह भाटघर, नीरा-देवघर धरणांच्या पट्ट्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कनेरे : जून महिन्याच्या सुरुवातीला भोर तालुक्यासह भाटघर, नीरा-देवघर धरणांच्या पट्ट्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती़ यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत चालली होती़ मात्र मागील आठवड्यापासून पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यातील वाढ ठप्प झाली आहे. आजच्या स्थितीला भाटघर धरणात सहा टीएमसी, तर नीरा देवघर धरणात साडेतीन टीएमसी पाणीसाठा आहे़.तालुक्यातील भाटघर, नीरा-देवघर धरण परिसरात अत्यल्प पाऊस पडत असल्याने धरणसाखळीत आजअखेर समाधानकारक पाणीसाठा नाही़ यामुळे या धरणांच्या पाण्यावर अवलंबून आसणारे पूर्वेकडील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालुक्याच्या डोंगर माथ्यावर पडणाऱ्या पावसापेक्षा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस पडत होता़ मात्र आठ दिवसांपासून पावसाची विश्रांती वाढत चालल्याने परिसरातील भातरोपे करपत चालली आहेत, तर धरणांच्या पूर्वेकडील भागात शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत़ तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़>लोकमत न्यूज नेटवर्कवेल्हे : वेल्हे तालुक्यातील साठवण क्षमतेने सर्वात मोठे असणाऱ्या पानशेत धरणाच्या खोर्यात मागील दि.२५ जून ते ५ जूलै दरम्यान झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात कांही आंशी भर पडली आहे. मात्र ५ जुलैपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पानशेत धरणात येणार्या पाण्याचा वेग आतिशय मंदावला आहे. परिणामी धरणसाठ्यात जलद गतीने होणारी वाढ कमी झाली आहे. दि. १३ जुलैअखेर धरणात ४६.८७% पाणी आहे. वेल्ह्यानजीक असाणार्या कानंदी नदीवरील गुंजवणी धरणातही पाणीसाठ्यात काहीशी वाढ होऊन सध्या पाणी २८.३६% पाणी असून वाढ स्थिर झाली आहे. तसेच मोसे नदी खोयार्तील वरसगाव धरणसाठ्यातही पाण्याची भर होण्याचा वेग मंदावला आहे. सध्या वरसगाव धरणात २१.०४ एवढे पाणी आहे. तर टेमघर धरणातही पाणी पातळीत मागील आठवड्यापासून विशेष वाढ झाली नसून येथे ७.९६ %पाणी आहे. तर खडकवासला धरणात २५.५१% पाणीसाठा शिल्लक आहे.पुणे शहराला पाणिपुरवठा करणा?्या खडकवासला धरण साखळीत खडकवासला धरणाच्या आगोदर पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणसाखळी असून वेल्हे तालुक्यात पडणार्या पावसावर पानशेत आणि वरसगाव ही दोन धरणे भरतात. तर टेमघर धरण मुळशी तालुक्यात येते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या साखळीत पाण्याची वाढ होण्याची गती मंदावली आहे.आंबी नदी खोरे, मोसे नदी खोरे, पानशेतचा कोकणालगत रायगड जिल्ह्यानजीकचा अतिदुर्गम पश्चिम पट्टा या भागात मागील सप्ताहापासून पावसाने उघडझाप करण्याचे धोरण अवलंबले असल्याने धरणाकडे पाणी येण्याचा वेग कमी झाला आहे. १ जूनपासून पानशेत धरण खोऱ्यात ६०९ मि.मी., वरसगाव ६३० मि.मी., टेमघर ४ मि.मी., खडकवासला ७ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.पानशेत धरणाची क्षमता १०.६५ टीएमसी आहे. दि.१३ जुलैअखेर धरणात ४.९९ टीएमसी साठा आहे. तर वरसगाव धरणाची क्षमता १२.८२ टीएमसी आहे व सध्या २.७०टीएमसी पाणी शिल्लक आहे. तर टेमघर ची क्षमता ३ टीऐमसी असून सध्या ०.३०% पाणी आहे. तर शेवटच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९९ टीएमसी असून सध्या ०.५१% पाणी शिल्लक आहे.