शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
4
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
5
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
6
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
7
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
8
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
9
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
10
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
11
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
12
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
13
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
14
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
15
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
16
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
17
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
18
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
19
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
20
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू

पाच नगरसेवकांची अपात्रता निश्चित

By admin | Updated: August 1, 2016 03:01 IST

राखीव वॉर्डातून निवडणूक लढवल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यात सादर न केल्याने वसई विरार महानगरपालिकेचे पाच नगरसेवक अपात्र ठरणार आहेत.

शशी करपे,

वसई- राखीव वॉर्डातून निवडणूक लढवल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यात सादर न केल्याने वसई विरार महानगरपालिकेचे पाच नगरसेवक अपात्र ठरणार आहेत. महापालिकेने प्रस्ताव नगरविकास खात्याला सादर केला असून यासंंबंधीची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती नगरविकास खात्यातील एका अधिकाऱ्याने दिली.वसई विरार पालिकेची निवडणूक झाल्यानंतर १४ डिसेंबर २०१५ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. पालिकेत राखीव जागांमधून एकूण ४१ नगरसेवक निवडून आले आहेत. यातील ३६ नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केली होती. तर शिवसेनेचे स्वप्नील बांदेकर यांनी मुदतीनंतर चार दिवस उशिराने ते सादर केले. बहुजन विकास आघाडीचे अतुल साळुंखे यांनी चौदा दिवस, शबनम शेख यांनी १८ दिवस आणि हेमांगी पाटील यांनी १६ दिवस उशिराने ते सादर केले. तर समीर डबरे यांचे जात वैधता प्रमाणपत्र संशोधन अधिकाऱ्यांनी रद्द केले असून त्याबाबतचा दावा मुंबई हायकोर्टात दावा प्रलंबित आहे. मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित सदस्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्दबातल होते अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र, निवड रद्दबातल झाली असल्याचे औपचारिक आदेश कोणत्या अधिकाऱ्याने काढायचे यासंंबंधी स्पष्ट आदेश नव्हते. त्यामुळे यासंबंधी निर्णय होण्यास विलंब लागत होता. अ‍ॅड. जिमी घोन्सालवीस यांनी पाच नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासंबंधी पाठपुरावा केलनंतर राज्य सरकारने नगरविकास खात्याच्या अवर सचिवांवर जबाबदारी सोपवली आहे. >फक्त घोषणा होणे बाकीतदनंतर आता महापालिका आयुक्तांनी पाच नगरसेवकांनी मुदती नंतर जात वैधता प्रमाणपत्र दिल्याचा सविस्तर अहवाल पाठवला आहे. त्यामुळे आता अवर सचिवांकडून घोषणा होणे बाकी असून पाचही नगरसेवकांची अपात्रता होणार हे निश्चित झाले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील सदस्यांना अपात्र ठरवण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर नगरपालिका, महापालिकेच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याचे अधिकार नगरविकास खात्यातील अवर सचिवांना देण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग आणि स्थानिक संस्थांमधील चालढकल दूर होऊन निर्णय तत्परतेने होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.या निर्णयाचे दुरगामी स्वरुपाचे परिणाम होणार असून याच कारणासाठी आता राज्यभरातून नगरविकास खात्याकडे दाखल होणाऱ्या याचिकांचा महापूरच लोटणार आहे.