शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

निवडणुकीतील संघर्षमय विजयामुळं भाजपमध्ये जाण्यास गयाराम अनुत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 13:12 IST

सध्याची स्थिती पाहता, भाजपला निवडणुकीपूर्वीची इनकमिंग नडल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले आहे. अद्याप नवीन सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीचे सावट निर्माण झाले असून शिवसेना आणि भाजप यांच्यातील जुगलबंदी आणखीच वाढली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. मात्र निवडणुकीत झालेल्या संघर्षमय विजयामुळे विरोधी पक्षातील नेते फुटण्याची शक्यता कमी झाली आहे.  

विरोधकांना स्पर्धेतच ठेवायच नाही, असा विचार डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी विरोधीपक्ष नेत्यासह अनेक नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर निवडणुकीत समोर स्पर्धकच नसल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तशी स्थिती राज्यात दिसत होती. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते आधाची भाजपमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देत निवडूनही आणले. त्यामुळे भाजपच्या विधानसभेच्या अनेक जागा घटल्या. तर राष्ट्रवादीत काठावर असलेले सर्वच नेते सत्ताधारी गटात सामील झाल्याने आता राष्ट्रवादीत काठावर असलेले नेते उरले नाही. 

आधीच अनेक नेते भाजपमध्ये सामील झाल्याने आता पक्षांतर करण्याच्या विचारात विरोधी पक्षातील आमदार दिसत नाहीत. तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपैकी 80 टक्के नेते पराभूत झाले आहे. त्यामुळे पक्षांतर धोक्याचे ठरू शकतं, असा मतप्रवाह नेत्यांमध्ये तयार झाला आहे. यामुळेच आता राज्यात पक्षांतर पाहायला मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.