शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीतील संघर्षमय विजयामुळं भाजपमध्ये जाण्यास गयाराम अनुत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 13:12 IST

सध्याची स्थिती पाहता, भाजपला निवडणुकीपूर्वीची इनकमिंग नडल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले आहे. अद्याप नवीन सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीचे सावट निर्माण झाले असून शिवसेना आणि भाजप यांच्यातील जुगलबंदी आणखीच वाढली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. मात्र निवडणुकीत झालेल्या संघर्षमय विजयामुळे विरोधी पक्षातील नेते फुटण्याची शक्यता कमी झाली आहे.  

विरोधकांना स्पर्धेतच ठेवायच नाही, असा विचार डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी विरोधीपक्ष नेत्यासह अनेक नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर निवडणुकीत समोर स्पर्धकच नसल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तशी स्थिती राज्यात दिसत होती. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते आधाची भाजपमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देत निवडूनही आणले. त्यामुळे भाजपच्या विधानसभेच्या अनेक जागा घटल्या. तर राष्ट्रवादीत काठावर असलेले सर्वच नेते सत्ताधारी गटात सामील झाल्याने आता राष्ट्रवादीत काठावर असलेले नेते उरले नाही. 

आधीच अनेक नेते भाजपमध्ये सामील झाल्याने आता पक्षांतर करण्याच्या विचारात विरोधी पक्षातील आमदार दिसत नाहीत. तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपैकी 80 टक्के नेते पराभूत झाले आहे. त्यामुळे पक्षांतर धोक्याचे ठरू शकतं, असा मतप्रवाह नेत्यांमध्ये तयार झाला आहे. यामुळेच आता राज्यात पक्षांतर पाहायला मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.