शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

निवडणुकीतील संघर्षमय विजयामुळं भाजपमध्ये जाण्यास गयाराम अनुत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 13:12 IST

सध्याची स्थिती पाहता, भाजपला निवडणुकीपूर्वीची इनकमिंग नडल्याचे दिसून येत आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटून गेले आहे. अद्याप नवीन सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीचे सावट निर्माण झाले असून शिवसेना आणि भाजप यांच्यातील जुगलबंदी आणखीच वाढली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. मात्र निवडणुकीत झालेल्या संघर्षमय विजयामुळे विरोधी पक्षातील नेते फुटण्याची शक्यता कमी झाली आहे.  

विरोधकांना स्पर्धेतच ठेवायच नाही, असा विचार डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी विरोधीपक्ष नेत्यासह अनेक नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर निवडणुकीत समोर स्पर्धकच नसल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तशी स्थिती राज्यात दिसत होती. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते आधाची भाजपमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देत निवडूनही आणले. त्यामुळे भाजपच्या विधानसभेच्या अनेक जागा घटल्या. तर राष्ट्रवादीत काठावर असलेले सर्वच नेते सत्ताधारी गटात सामील झाल्याने आता राष्ट्रवादीत काठावर असलेले नेते उरले नाही. 

आधीच अनेक नेते भाजपमध्ये सामील झाल्याने आता पक्षांतर करण्याच्या विचारात विरोधी पक्षातील आमदार दिसत नाहीत. तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपैकी 80 टक्के नेते पराभूत झाले आहे. त्यामुळे पक्षांतर धोक्याचे ठरू शकतं, असा मतप्रवाह नेत्यांमध्ये तयार झाला आहे. यामुळेच आता राज्यात पक्षांतर पाहायला मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.