शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

महाड तालुक्यात भातलावणीला सुरुवात

By admin | Updated: June 28, 2016 02:33 IST

महाड तालुक्यात पावसाने अद्याप जोर धरला नसला तरी दिवसभरात पडणाऱ्या झुंजूमुंजू पावसात शेतकऱ्यांनी भातलावणीस सुरुवात केली

दासगांव : महाड तालुक्यात पावसाने अद्याप जोर धरला नसला तरी दिवसभरात पडणाऱ्या झुंजूमुंजू पावसात शेतकऱ्यांनी भातलावणीस सुरुवात केली आहे. तालुक्यातील सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा फायदा घेत शेतकरी भातलावणी करण्याकडे वळला आहे.कोकणात पावसाने काही दिवसांपूर्वी जोमाने हजेरी लावली असली तरी जोर धरला नाही. गेली दोन दिवस तालुक्यात तुरळक पाऊस पडत असून दिवसभर होणाऱ्या रिपरिप पावसाने तालुक्याच्या सखल भागात पाणी साचू लागले आहे. तालुक्यातील शहराच्या जवळचा परिसर, तसेच सखल भागात शेतात साचलेले पाणी शेतकऱ्यांनी अडवून त्यामध्ये भातलावणी करण्यास सुरुवात केली आहे. पावसात जोर नसल्याने उंच आणि डोंगराळ भागातील शेतकरी अद्याप चिंताग्रस्त आहेत. महाड तालुक्यातील शहराजवळचा परिसर, खाडीपट्टा, नाते विभाग, बिरवाडी विभाग, वाळण विभागात येथे भातलावणीला सुरु वात दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने लवकर पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांची भाताची रोपे पहिल्या पावसातच वर आली होती. त्या रोपांची लावणी आता होणे गरजेचे आहे. याकरिता शेतकऱ्यांनी मिळेल त्या पाण्यावर भातलावणी सुरू केली आहे.महाड तालुक्यात भातशेतीचे एकूण क्षेत्र १३ हजार ६०० हेक्टर असले तरी या सर्वच क्षेत्रावर सध्या भातपीक घेतले जात नाही. मात्र महाड तालुक्यात गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने भात शेती करणारे २८ हजार शेतकरी आहेत. मे महिन्यापासून भाताच्या कामांना सुरुवात होते. त्याची समाप्ती भात लावणी आणि त्यानंतर भात झोडणीपर्यंतच्या या प्रवासात शेतकऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत. कोकणातील शेतकऱ्यांचे हे श्रम संपूर्णत: पावसावर अवलंबून आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला नाही. ढगाळ वातावरणामुळे पाऊस जोमाने हजेरी लावेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र आजही महाड तालुक्यात पडणाऱ्या पावसाने अद्याप पाचशे मि.मी.चा आकडा पार केलेला नाही. तालुक्यात प्रतिवर्षी हे प्रमाण अधिक असतो. मात्र यावर्षी रुसलेल्या पावसाने शेतकऱ्याला चिंता निर्माण केली आहे.पाऊस पडू लागताच भात लावणीला वेग येतो मात्र यावेळी निर्माण होणारी मजुरांची कमतरता यामुळे आता शेतकरी मिळेल त्या पाण्यावर भात लावणी करून घेत आहेत. (वार्ताहर)>मुरुड तालुक्यात भात पेरणीची कामे पूर्णगेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुरुड तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे राबांची स्थिती उत्तम असून तालुक्यातील अनेक भागात भातशेतीच्या लावणीस प्रारंभ झाला आहे. मुरुड तालुक्यात एकू ण तीन हजार ९०० हेक्टर भात शेतीचे क्षेत्र असून या सर्व क्षेत्रातील पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. यावर्षी तालुक्यात २२५ क्विंटल ६३ कि.ग्रॅ. भात बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्यावर्षी १९२ क्ंिवटलपेक्षा यावर्षीचे प्रमाण जास्त आहे. हल्ली शेतकरी सरकारी बियाणेच वापरत आहेत, अशी माहिती मुरुडचे गटविकास अधिकारी ए. यू. चव्हाण यांनी दिली. खोडकिडा रोग निर्मूलनासाठी औषध पन्नास टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु त्याचा वापर शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे. अन्य फवारणीसाठी लागणारी औषधेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे सांगून पन्नास टक्के अनुदानासाठी वीस ते पंचवीस रुपये खर्च येतो. परंतु शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात, तसे त्यांनी करू नये असेही ते म्हणाले. मुरुड तालुक्यातील उसरोली, आदाड, वावे, वांद्रे, फोफळी वेळास्ते, सुपेगाव, सर्वे आदि गावातील शेतातील लावणीची कामे जोरात सुरू झाली असून अन्य शेतीतील उखळणीची कामे जोरात सुरू आहे,