शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

वैद्यकीय विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण

By admin | Updated: March 3, 2017 02:18 IST

आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ९५ विद्यार्थी बुधवारपासून आझाद मैदनात बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत.

मुंबई : सातारा जिल्ह्यातील मायणी येथील आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ९५ विद्यार्थी बुधवारपासून आझाद मैदनात बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. गेल्या ४४ दिवसांपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतरही न्याय मिळाला नाही. अखेर मुख्यमंत्र्यांनी प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, या एकमेव मागणीसाठी संबंधित विद्यार्थ्यांनी साखळी उपोषणाचे रूपांतर आता बेमुदत उपोषणात केले आहे.आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवेशात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत मुंबईच्या प्रवेश नियंत्रण समितीने आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयावर २० कोटी रुपये दंडात्मक कारवाई केली होती. महाविद्यालय दंड भरण्यास तयार नसल्याने विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या वेळी राज्य सरकार विद्यार्थ्यांसोबत होते. विद्यार्थ्यांना सरकारने २० कोटी रुपये दंडही भरला. त्यानंतर दंडाची वसुली करण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाला वसुलीची नोटीस बजावली. मात्र या कारवाईत विद्यार्थ्यांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पहिल्या वर्षाची परीक्षा दिलेले वैद्यकीय शिक्षण घेणारे ९५ विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून प्रवेश बदलाच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप पहिल्या वर्षी दिलेल्या परीक्षेचा निकालही लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षे वाया जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात सुरू केलेल्या लढ्यासाठी स्टुडन्ट युनियन (एमबीबीएस) या संघटनेची स्थापना करत सलग ४२ दिवस सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण केले. मात्र आचारसंहितेचे कारण देत कोणत्याही नेत्याने त्यांना भेट दिली नाही. मुंबईतील निवडणुका संपल्याने मुख्यमंत्री या प्रकरणी तोडगा काढतील, अशी अपेक्षा संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या अभिषेक मराठे याने व्यक्त केली आहे. अभिषेक म्हणाला की, मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी उपोषण मागे घेणार नाहीत. (प्रतिनिधी)>दंड भरूनही निर्णय नाहीआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयावर २० कोटी रुपये दंडात्मक कारवाई केली होती. महाविद्यालय दंड भरत नसल्याने विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारने २० कोटी रुपये दंडही भरला. मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही़