शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

१९५२ मध्ये जगाला महामानवाचे मोठेपण सांगणारा सोहळा कोल्हापुरात झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:38 IST

बाबासाहेबांना महिलांनी दिले होते मानपत्र

विश्वास पाटीलकोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवंतपणीच बिंदू चौकात पुतळा बसविणाऱ्या कोल्हापूरने त्यानंतर दोनच वर्षांनी मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता. विशेष म्हणजे महिलांनी हा समारंभ आयोजित केला होता. महिलांना वारसाहक्कात स्थान देणारे हिंदू कोड बिल मंजूर करावे, यासाठी आग्रह धरणाऱ्या डॉ. बाबासाहेब यांना पाठबळ देण्याची भूमिका त्यामागे होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या आठवणी ताज्या झाल्या.

करवीर भगिनी मंडळ, शुक्रवार पेठ भगिनी मंडळ, महिला सेवा मंडळ, वनिता समाज, नामदेव महिला मंडळ, शारदादेवी महिला मंडळ, स्त्री मंडळ, शिवाजी पेठ भगिनी मंडळ आणि मराठा महिला मंडळ ही मानपत्र देणारी नऊ मंडळे आहेत. स्वातंत्र्यानंतर लगेचच या महिलांना बाबासाहेबांना मानपत्र द्यावे असे वाटावे यामध्येच कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय प्रगल्भतेचे प्रत्यंतर येते. हे मानपत्र २५ डिसेंबर १९५२ रोजी राजाराम टॉकीजमध्ये देण्यात आले. विशेष नोंद म्हणजे बाबासाहेब त्या सोहळ्यास पत्नी माईसाहेब आंबेडकर यांच्यासह आले होते. 

या भगिनी मानपत्रात म्हणतात...माननीय बाबासाहेब, कोल्हापुरात १५ वर्षांपासून नऊ भगिनी मंडळे भगिनी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत. मुंबई प्रांतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा होण्यापूर्वी तो व्हावा, असा आवाज प्रथम कोल्हापूरच्या महिलांनीच उठवला होता. सन १९४१ व १९४७ मध्ये हंसा मेहता व लेडी रामराव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील अखिल भारतीय महिला परिषदेत वारसा हक्काची मागणी झाली. हिंदू कोड बिलानेच महिलांच्या आकांक्षांची पूर्तता होणार हे जाणून सर्व भगिनींनी त्यास एकमुखी पाठिंबा दिला. त्यामुळे इच्छा नसतानाही राज्यकर्त्यांना सार्वत्रिक निवडणुकीत या बिलास पाठिंबा द्यावा लागला. आज जरी प्रासंगिक लाभासाठी हे बिल मागे खेचण्याचा काहीजण प्रयत्न करत असले तरी त्यांचा तो प्रयत्न म्हणजे सुपाने सूर्य झाकण्याचा हव्यास बाळगण्यासारखेच वेडेपणाचे आहे. (संदर्भ : डॉ. जी.पी. माळी यांचे कोल्हापूरची शतमानपत्रे हा ग्रंथ)

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर