शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

१९५२ मध्ये जगाला महामानवाचे मोठेपण सांगणारा सोहळा कोल्हापुरात झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:38 IST

बाबासाहेबांना महिलांनी दिले होते मानपत्र

विश्वास पाटीलकोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवंतपणीच बिंदू चौकात पुतळा बसविणाऱ्या कोल्हापूरने त्यानंतर दोनच वर्षांनी मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता. विशेष म्हणजे महिलांनी हा समारंभ आयोजित केला होता. महिलांना वारसाहक्कात स्थान देणारे हिंदू कोड बिल मंजूर करावे, यासाठी आग्रह धरणाऱ्या डॉ. बाबासाहेब यांना पाठबळ देण्याची भूमिका त्यामागे होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या आठवणी ताज्या झाल्या.

करवीर भगिनी मंडळ, शुक्रवार पेठ भगिनी मंडळ, महिला सेवा मंडळ, वनिता समाज, नामदेव महिला मंडळ, शारदादेवी महिला मंडळ, स्त्री मंडळ, शिवाजी पेठ भगिनी मंडळ आणि मराठा महिला मंडळ ही मानपत्र देणारी नऊ मंडळे आहेत. स्वातंत्र्यानंतर लगेचच या महिलांना बाबासाहेबांना मानपत्र द्यावे असे वाटावे यामध्येच कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय प्रगल्भतेचे प्रत्यंतर येते. हे मानपत्र २५ डिसेंबर १९५२ रोजी राजाराम टॉकीजमध्ये देण्यात आले. विशेष नोंद म्हणजे बाबासाहेब त्या सोहळ्यास पत्नी माईसाहेब आंबेडकर यांच्यासह आले होते. 

या भगिनी मानपत्रात म्हणतात...माननीय बाबासाहेब, कोल्हापुरात १५ वर्षांपासून नऊ भगिनी मंडळे भगिनी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत. मुंबई प्रांतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा होण्यापूर्वी तो व्हावा, असा आवाज प्रथम कोल्हापूरच्या महिलांनीच उठवला होता. सन १९४१ व १९४७ मध्ये हंसा मेहता व लेडी रामराव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील अखिल भारतीय महिला परिषदेत वारसा हक्काची मागणी झाली. हिंदू कोड बिलानेच महिलांच्या आकांक्षांची पूर्तता होणार हे जाणून सर्व भगिनींनी त्यास एकमुखी पाठिंबा दिला. त्यामुळे इच्छा नसतानाही राज्यकर्त्यांना सार्वत्रिक निवडणुकीत या बिलास पाठिंबा द्यावा लागला. आज जरी प्रासंगिक लाभासाठी हे बिल मागे खेचण्याचा काहीजण प्रयत्न करत असले तरी त्यांचा तो प्रयत्न म्हणजे सुपाने सूर्य झाकण्याचा हव्यास बाळगण्यासारखेच वेडेपणाचे आहे. (संदर्भ : डॉ. जी.पी. माळी यांचे कोल्हापूरची शतमानपत्रे हा ग्रंथ)

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर