शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

CAA: संविधान बदलण्यास भाजपकडून सुरुवात: इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 12:17 IST

आता महाराष्ट्रात सुद्धा एमआयएम नागरिकत्व कायद्याचा विरोधात रस्तावर उतरणार आहे.

मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात जोरदार आंदोलनं होत आहेत. तसेच हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणारा असल्याचा आरोप करत कायदा मागे घेण्याची मागणी होत आहे. विरोधकांकडून सुद्धा याच मुद्यावरून भाजपवर टीका केली जात आहे. तर संविधान  बदलण्याचा प्रयत्न केला जात असून याची सुरवात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने भाजपने केली असल्याची टीका एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन देशभर उसळलेल्या जनक्षोभानंतर विरोधी पक्षही यावर आक्रमक झाले आहेत. त्यामुळे देशभरात याचे राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. बसपा प्रमुख मायावती, पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी या कायद्याला विरोध केला आहे. तर वेळ पडल्यास रस्तावर उतरण्याचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. तर आता महाराष्ट्रात सुद्धा एमआयएम नागरिकत्व कायद्याचा विरोधात रस्तावर उतरणार आहे.

औरंगाबादमध्ये एमआयएमच्या वतीने 20 डिसेंबर ( शुक्रवारी ) नागरिकत्व कायद्याचा विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळावरी खासदार जलील यांनी पक्षाची आढावा बैठक घेतली. औरंगाबाद जिल्ह्यात निघणारा मोर्चा सर्वात मोठा असा मोर्चा ठरणार आहे. त्यामुळे संविधानावर विश्वास ठेवणारे आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांनी यात सहभाग घ्यावा. तसेच देशात संविधान  बदलण्यासाठी काही लोकं प्रयत्न करत असून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमत्ताने भाजपने याची सुरवात केली असल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केला.

भाजप सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला फक्त मुस्लिमच नाही तर सर्वच समाजातील लोकं विरोध करत असल्याचे जलील म्हणाले. तर हा मोर्चा कोणत्याही एका समाजासाठी नव्हे तर देशावर आलेल्या संकटाच्या विरोधात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांवर अन्याय करणारे कितीही कायदे आणले तरीही त्याला जनता मान्य करणार नसून, त्याला आम्ही विरोध करणारच असेही जलील म्हणाले.