शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

एमआरटीपी कायद्यात सुधारणा करणार

By admin | Updated: August 4, 2016 04:43 IST

अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली की थोड्याच दिवसांत पुन्हा बांधकाम केले जाते.

मुंबई : अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली की थोड्याच दिवसांत पुन्हा बांधकाम केले जाते. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना कायमचा आळा घालण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या एमआरटीपी कायद्यात सुधारणा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी डोंगरी परिसरातील केशवजी नाईक रोडवरील ११ क्रमांकाच्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम सुरू असून मंजूर आराखड्यास डावलून हे बांधकाम केले गेल्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला. या इमारतीला चार मजल्याची परवानगी असताना तिथे ११ मजल्याची इमारत बांधली गेली. या इमारतीचे निष्कासन कधी करणार, असा सवाल मुंडे यांनी केला. डोंगरीतील क्रमांक अकरा इमारतीचे विनापरवाना अनधिकृत बांधकाम १५ दिवसांत पाडण्यात येईल, तसेच शहरातील अन्य उपकरप्राप्त इमारतींची विनापरवाना दुरुस्ती किंवा पुनर्विकास करणाऱ्या व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई करण्यासाठी एमआरटीपी कायद्यात आवश्यक बदल करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी केली. सध्याच्या एमआरटीपी कायद्यातील प्रक्रिया खूप लांबलचक आहे. त्यात वेळ जात असल्यामुळे अनधिकृत बांधकाम पुन्हा केले जाते. ही प्रक्रिया कमी करण्यासाठी या कायद्यात सुधारणा केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.दरम्यान, अनेक प्रकरणांमध्ये विकासक कोर्टात धाव घेतात आणि कारवाईला स्थगिती मिळवतात. ‘जैसे थे’ चा निकाल दिल्यामुळे कारवाई थांबवावी लागते. प्रत्यक्षात अनधिकृत बांधकामांना ‘जैसे थ’चा निकाल देऊ नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश असताना खालची न्यायालये मात्र तसा निकाल देतात. त्यामुळे अशा सर्व प्रकरणातील निकालांचे एकत्रिकरण करून ते उच्च न्यायालयाच्याच निदर्शनास आणण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)