शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या प्रगतीचा सरकारकडून आभास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 06:10 IST

‘मेक इन इंडिया’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ यांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे सादर करून राज्य शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा केवळ आभास निर्माण केला आहे. शा

पुणे : ‘मेक इन इंडिया’ व ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ यांच्या माध्यमातून गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे सादर करून राज्य शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा केवळ आभास निर्माण केला आहे. शासनाकडून गुंतवणुकीची व रोजगाराची फसवी आकडेवारी जाहीर केली जात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पुण्यात केला.काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिली जाणारी आकडेवारी ही जाहिरातबाजी आहे. या जाहिरातबाजीतून किती रोजगार निर्मिती होणार आहे, याची माहिती राज्य शासनाने जाहीर करायलाहवी, असे ते म्हणाले.सध्या महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी होत चालली असून गुजरातमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली फडणवीस यांनीमुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र सोडून देवून अहमदाबादमध्ये दिले आहे. हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरणागती पत्करून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. त्याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.गेल्या पाच वर्षात राज्याचा सरासरी विकासदर ७.३ टक्के असून ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी किमान २०३२ साल उजाडणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. गेल्या तीन वर्षाच्या युती सरकारच्या कालावधीत राज्याची अर्थव्यव्सथा डबघाईला आली आहे,असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Magnetic Maharashtraमॅग्नेटिक महाराष्ट्र