शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

डॉल्बीपेक्षाही वरचढ ठरला ग्रामस्थांचा आव्वाज

By admin | Updated: May 21, 2015 00:12 IST

भुर्इंजमध्ये भावनांचा उद्रेक : कर्णकर्कश आवाजाला कंटाळून ग्रामसभेत घेतला बंदीचा निर्णय-- गूड न्यूज.

भुर्इंज : डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या भुर्इंज ग्रामस्थांनी अखेर ग्रामसभा घेऊन गावात डॉल्बीला बंदी करण्याचा निर्णय घेऊन डॉल्बीचा आवाज बंद केला. विशेष म्हणजे ग्रामसभेला नेहमी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे ग्रामस्थ उपस्थित असतात. मात्र, डॉल्बीबंदीसाठी बोलाविण्यात आलेल्या सभेला शेकडो ग्रामस्थांसह महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.भुर्इंजमध्ये तीन मंगल कार्यालये आहेत. लग्नसराईत दररोज याठिकाणी विवाहसोहळे पार पडत असतात. भुर्इंज येथील नाक्यापासून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत काढण्यात येणाऱ्या नवरदेवाच्या मिरवणुकीत वाजणाऱ्या डॉल्बीमुळे या मार्गावरील व्यावसायिक तसेच ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. विशेषत: लहान मुले, वृद्ध व रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना होती. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामसभा घेऊन डॉल्बी बंदीचा निर्णय घेण्यात आला. सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. भुर्इंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी डॉल्बी बेकायदा असल्याचे सांगून यापुढे डॉल्बीला गावात अटकाव केला जाईल, असे सांगितले. भुर्इंज ग्रामस्थांच्या संतप्त भावनांची दखल घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्यानेच यापुढे गावात डॉल्बी अजिबात वाजू देणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.ग्रामपंचायत सदस्य चंद्रदीप भोसले यांनी या निर्णयास ग्रामस्थांनी जो पाठिंबा दिला तो आनंददायी आहे. त्यामुळेच भुर्इंजसारख्या मोठ्या गावात हा निर्णय झाल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत माधवराव, मदन शिंदे, चंद्रलेखा भोसले, मधुकाका भोसले, शेखर मोरे, विजय गाडे, कृष्णराव जाधव, भाऊसाहेब जाधवराव, अतुल जाधवराव, सुमित सूर्यवंशी, सदाभाऊ रोकडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष जगन्नाथ दगडे, विजयमाला सूर्यवंशी, संजीवनी दळवी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)मंगल कार्यालय मालकांचाही पाठिंबाविशेष म्हणजे लग्नाच्या वरातीसाठी घोडे देणाऱ्या व मंगल कार्यालय मालकांनीही भुर्इंजकरांच्या डॉल्बीबंदीला पाठिंबा दिला आहे. तसेच ज्या लग्नात डॉल्बी नसेल त्यांनाच वरातीसाठी घोडा व मंगल कार्यालय देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तातडीने अंमलबजावणीभुर्इंज गावातील युवा उद्योजक विनित खरे याचा विवाह भुर्इंजमध्ये होणार आहे. या सोहळ्यात आपण डॉल्बी वाजविणार नाही, असे सभेतच जाहीर केले. त्याच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.