शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी

By admin | Updated: January 11, 2017 04:46 IST

सार्वजनिक आरोग्य विभागात दुसरे एक संचालकपद निर्माण करणारा आदेश अखेर आरोग्य विभागाने काढला.

अतुल कुलकर्णी / मुंबईसार्वजनिक आरोग्य विभागात दुसरे एक संचालकपद निर्माण करणारा आदेश अखेर आरोग्य विभागाने काढला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी लेखी आदेश देऊनही त्याच्या अंमलबजावणी फाइल जाणीवपूर्वक पुढे नेली जात नसल्याचे वृत्त लोकमतने प्र्रकाशित करताच हा आदेश काढण्यात आला आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य आयुक्तालय म्हणून ओळखला जाईल आणि संचालकाचे आणखी एक पद निर्माण करून त्यांच्या कामाचे वाटप करावे, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यानंतर १८ आॅक्टोबर रोजी त्यासंबंधीचे आदेशही निघाले. मात्र आता दोन महिने उलटून गेले तरीही त्या आदेशाची अंमलबजावणीच होत नव्हती. ही फाइल जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याचे आरोप होत होते. सदरचे वृत्त लोकमतने ३ जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयानेदेखील याचा जाब आरोग्य विभागाला विचारला आणि ९ जानेवारी रोजी दुसरे संचालकांचे पद निर्माण करण्याचा आदेश निघाला.या निर्णयानुसार आता नवनिर्मित संचालक आरोग्य सेवा या पदाची कार्यकक्षा तसेच कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील, असेही त्यात म्हटले आहे. उद्यापासून पुण्यात राज्यातील सगळ्या आरोग्य अधिकाऱ्यांची तीन दिवसीय परिषद होणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव विजय सतबिरसिंग, आरोग्य आयुक्त डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हे अधिकारी मुंबईत आले की कामाच्या वाटपाची फाइल मुख्यमंत्री कार्यालयात पाठवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुखपद आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्यावे आणि त्यांच्या हाताखाली सहसंचालकांची चार पदे तयार करावीत, त्यांना कामांचे वाटप करून द्यावे ही रचना मुळात तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी मांडली होती. ज्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्त्वत: मान्यता दिली पण त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या लॉबीने लांबवली. त्यानंतर आरोग्य विभागातील २९७ कोटींच्या औषध खरेदीचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणले. खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे सरकारने विधान परिषदेत लेखी प्रश्नोत्तरात मान्यही केले. आता संचालकांची दोन पदे निर्माण झाल्याने कामांचे वाटप विचारपूर्वक केले जाईल, असे स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकमतला सांगितले.