शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

वस्तुस्थितीला धरून नसलेल्या बातम्यांचा तातडीने खुलासा करा; राज्य सरकारचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:02 IST

प्रत्येक विभागाने एक समन्वय अधिकारी नेमावा आणि ठरवून दिलेल्या वेळेत माहितीसह खुलासा पाठवावा, असेही निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारच्या विविध योजना, धोरणे किंवा प्रकल्पांबाबत वस्तुस्थितीला धरून नसलेल्या बातम्यांचा तातडीने खुलासा करावा, असे आदेश राज्य सरकारने सर्व विभागांना दिले आहेत. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यासंदर्भातील वस्तुस्थिती प्रशासनाकडून मांडली जावी, यासाठी प्रत्येक विभागाने एक समन्वय अधिकारी नेमावा आणि ठरवून दिलेल्या वेळेत माहितीसह खुलासा पाठवावा, असे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ आणि डिजिटल माध्यमात विविध बातम्या येत असतात. यात राज्य सरकारबद्दल प्रसिद्ध होणाऱ्या वस्तुस्थितीला धरून नसलेल्या किंवा प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत अभिप्राय तसचे वस्तुस्थितीदर्शक माहिती तातडीने सादर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने विस्तृत शासन निर्णय जारी केला. सरकारच्या कारभाराबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर प्रतिसाद दिल्यास सरकारची प्रतिमा उंचावण्यास मदत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ फेब्रुवारी रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार प्रशासन विभागाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली आहे. 

अशी असेल कार्यपद्धती

  • वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांचे संकलन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे केले जाईल व अशा बातम्यांची कात्रणे व मजकूर त्याच दिवशी संगणक प्रणालीद्वारे संबंधित विभागांकडे पाठविले जातील. तर, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील अशा बातम्यांची क्लिप पाठविली जाईल.    
  •  वृत्तपत्रातील बातम्यांबाबत वस्तुस्थितीदर्शक माहितीसह, विभागाचा अभिप्राय सचिवांची मान्यता घेऊन बारा तासांच्या आत माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडे पाठवावा. तर, इलेक्ट्राॅनिक माध्यमांतील बातम्यांबाबतचा प्रतिसाद दोन तासांत मंत्री, राज्यमंत्री, सचिव, आयुक्त अथवा संबंधित अधिकाऱ्यांच्या बाईट्सह दोन तासांत पाठविण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. 
  • यासाठी प्रत्येक विभागाने सहसचिव किंवा उपसचिव अधिकाऱ्याची समन्वयासाठी नियुक्ती करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार