शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क सरसकट माफ करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:55 IST

छात्रभारती विद्यार्थी संघटना : मुंबई विद्यापीठात उद्यापासून बेमुदत उपोषण

मुंबई : ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतिगृह शुल्क सरसकट माफ व्हावे, या मागणीसाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने ६ नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन दिले होते. आजतागायत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या सरसकट फीमाफीबाबत मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले नाही़ परिणामी आज मंगळवारी सकाळी ९ पासून छात्रभारती बेमुदत उपोषण सुरू करत आहे, अशी माहिती छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी दिली.राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अति पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. दिवाळीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.आॅगस्ट - सष्टेंबरमध्ये सांगली, कोल्हापूर, गडचिरोलीसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पावसाने शेतकºयाचे अगणित नुकसान झाले आहे.ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक शुल्क न भरता आल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा देणे अपेक्षित असताना प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतिगृह शुल्क सरसकट माफ करण्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने अद्याप काढलेले नाही.किरकोळ परीक्षा शुल्क माफ करून विद्यापीठ प्रशासन या विद्यार्थ्यांची चेष्टा करू पाहत आहे़ जोवर विद्यापीठ ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची सरसकट फीमाफी करत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील, असेही ढाले यांनी सांगितले. शेतकरी, कष्टकरी मुलांच्या शिक्षण हक्कासाठी आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ