शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क सरसकट माफ करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:55 IST

छात्रभारती विद्यार्थी संघटना : मुंबई विद्यापीठात उद्यापासून बेमुदत उपोषण

मुंबई : ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतिगृह शुल्क सरसकट माफ व्हावे, या मागणीसाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने ६ नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन दिले होते. आजतागायत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या सरसकट फीमाफीबाबत मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले नाही़ परिणामी आज मंगळवारी सकाळी ९ पासून छात्रभारती बेमुदत उपोषण सुरू करत आहे, अशी माहिती छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी दिली.राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अति पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. दिवाळीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.आॅगस्ट - सष्टेंबरमध्ये सांगली, कोल्हापूर, गडचिरोलीसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पावसाने शेतकºयाचे अगणित नुकसान झाले आहे.ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक शुल्क न भरता आल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा देणे अपेक्षित असताना प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतिगृह शुल्क सरसकट माफ करण्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने अद्याप काढलेले नाही.किरकोळ परीक्षा शुल्क माफ करून विद्यापीठ प्रशासन या विद्यार्थ्यांची चेष्टा करू पाहत आहे़ जोवर विद्यापीठ ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची सरसकट फीमाफी करत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील, असेही ढाले यांनी सांगितले. शेतकरी, कष्टकरी मुलांच्या शिक्षण हक्कासाठी आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ