शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

'दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क सरसकट माफ करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:55 IST

छात्रभारती विद्यार्थी संघटना : मुंबई विद्यापीठात उद्यापासून बेमुदत उपोषण

मुंबई : ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतिगृह शुल्क सरसकट माफ व्हावे, या मागणीसाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने ६ नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन दिले होते. आजतागायत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या सरसकट फीमाफीबाबत मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले नाही़ परिणामी आज मंगळवारी सकाळी ९ पासून छात्रभारती बेमुदत उपोषण सुरू करत आहे, अशी माहिती छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी दिली.राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अति पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. दिवाळीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.आॅगस्ट - सष्टेंबरमध्ये सांगली, कोल्हापूर, गडचिरोलीसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पावसाने शेतकºयाचे अगणित नुकसान झाले आहे.ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक शुल्क न भरता आल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा देणे अपेक्षित असताना प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतिगृह शुल्क सरसकट माफ करण्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने अद्याप काढलेले नाही.किरकोळ परीक्षा शुल्क माफ करून विद्यापीठ प्रशासन या विद्यार्थ्यांची चेष्टा करू पाहत आहे़ जोवर विद्यापीठ ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची सरसकट फीमाफी करत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील, असेही ढाले यांनी सांगितले. शेतकरी, कष्टकरी मुलांच्या शिक्षण हक्कासाठी आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ