शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

अडथळ्याला पार करून उठ मेरी जान...

By admin | Updated: November 23, 2015 02:34 IST

विविध क्षेत्रांत काम करीत असताना महिलांना अडथळ््यांचा सामना करावा लागतोय. पण आजची स्त्री सक्षम आहे आणि सर्व क्षेत्रांत नेतृत्व करू शकते, असा विश्वास व्यक्त करीत ‘उठ मेरी जान तुझे मेरे साथही चलना है’

पुणे : विविध क्षेत्रांत काम करीत असताना महिलांना अडथळ््यांचा सामना करावा लागतोय. पण आजची स्त्री सक्षम आहे आणि सर्व क्षेत्रांत नेतृत्व करू शकते, असा विश्वास व्यक्त करीत ‘उठ मेरी जान तुझे मेरे साथही चलना है’ असा नारा लोकमत वूमेन समिटच्या पाचव्या पर्वात गुंजला आणि महिलांना नवी उमेद देऊन गेला. कलर्स प्रस्तूत एनईसीसी सहयोगाने लोकमत वूमेन समिटच्या पाचव्या पर्वाचे शानदार उद्घाटन रविवारी महिला बालविकास, ग्रामविकास, जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे, प्रसिद्ध लेखक चेतन भगत, आॅल इंडिया अ‍ॅन्टिटेररिस्ट फ्रन्टचे प्रमुख मनिंदरसिंग बिट्टा, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा संजय काकडे, अजमेरा हाउसिंगच्या प्रमुख हिता अजमेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. महिलांवरील अत्याचारापासून ते त्यांनी गाठलेल्या कर्तृत्वाच्या शिखरापर्यंत महिला सक्षमीकरणाच्या अनेक मुद्यांवर या समिटमध्ये चर्चा झाली. पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. महिलांनी अबला बनून राहण्यापेक्षा सबला बनणे आवश्यक आहे, याची जाणीव त्यांच्यामध्ये आणि समाजातही झाली आहे. आजच्या काळातील स्त्री ही केवळ पुरोगामी नाही तर परंपराही टिकवून पुढे नेणारी आहे. ती पुरोगामित्व आणि परंपरेचे सुंदर प्रतीक आहे.स्त्री होण्याचा मला अभिमान आहे आणि तो प्रत्येक महिलेला असणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रांत काम करीत असताना महिलांना अडथळ््यांचा सामना करावा लागतो. पण लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. तसे केले तरच महिलांमधील नेतृत्वगुण विकसित होतील. ’’चेतन भगत म्हणाले, ‘‘आजची व्यवस्था पुरुषांनी त्यांच्या अनुरूप तयार केलेली आहे. महिलांचा विचार केला गेलेला नाही. गेल्या ५० वर्षांत महिला सशक्तीकरणात महत्त्वाची पावले उचलली गेली आहेत. महिलांना समानतेची वागणूक द्यायची असेल तर ही व्यवस्था स्त्री-पुरुष या दोघांचाही विचार करून तयार केली गेली पाहिजे. मनुष्यजातीच्या ५ हजार वर्षांच्या इतिहासात पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या ५० वर्षांत हे चित्र बदलत असून, महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न वाढत आहेत. एका रात्रीत चित्र बदलायला हवे, अशी आशा ठेवणे चुकीचे आहे. निर्णयप्रक्रियेत महिलांना प्रत्यक्ष सहभागी करून घेतले जात नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत.’’ मनिंदरसिंग बिट्टा म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतातील स्त्री सशक्त आहे. कॅप्टन लक्ष्मी, इंदिरा गांधी ही त्याची उदाहरणे आहेत. देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. देशाच्या विविध भागांमध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यशाचे शिखर गाठणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यांचे हे कार्य समाजासमोर आणले गेले पाहिजे.’’ उषा काकडे म्हणाल्या, ‘‘लोकमत वूमेन समिटने महिलांचे प्रश्न प्राधान्यक्रमावर आणले आहेत.’’ लोकमत डॉट कॉम या संकेतस्थळावर दिवसभर या कार्यक्रमाचे वेब कास्टिंग झाले. जगभरातून या वूमेन समिटला आॅनलाइन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अजमेरा हाऊसिंगच्या सहयोगाने आयोजित या कार्यक्रमाचे आऊट डोअर पार्टनर सुलेखा कम्युनिकेशन प्रा. लि., एज्युकेशन पार्टनर सिंहगड इन्स्टिट्यूट, सहप्रायोजक मुद्रा लाईफ स्पेसेस, मुछाल साडी हे आहेत. समाजात स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, भेदभाव, दु:ख-दैन्य पाहून यामध्ये बदल घडविण्यासाठी (स्व.) ज्योत्स्ना दर्डा यांनी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी १९९९मध्ये ‘लोकमत सखी मंचा’ची स्थापना केली. आज या मंचाच्या देशभरात २ लाख ९८ हजार सक्रिय सभासद आहेत. यातूनच महिलांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी लोकमत वुमेन समिट ही राष्ट्रीय स्तरावरील चळवळ उभी राहिली. गेल्या पाच वर्षांपासून या वुमेन समिटमध्ये चर्चा झालेले प्रश्न संसदेपर्यंत गेले. परंतु, आजही महिलांना समाजात चांगली वागणूक मिळत नाही. ‘टेक इट ग्रॅन्टेड’ घेतले जाते. समाजात जो खरा सन्मान मिळायला हवा तो मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना घडतात. देशाला मजबूत करायचे असेल तर प्रत्येकाला आपल्या घरातून समानता आणावी लागेल आणि महिलांना सन्मान द्यावा लागेल. त्यासाठी देशपातळीवर पार्श्वभूमी तयार करण्याचे काम लोकमत वुमेन समिटच्या माध्यमातून होत आहे. महिलांना सन्मान देण्यासाठी ‘लोकमत’ने ‘ती’चा गणपती ही अनोखी संकल्पना सुरू केली आणि गणेशोत्सवात पौरोहित्यापासून सर्वच गोष्टी महिलांनी केल्या. तृतीयपंथीयांंनाही गणेशाच्या आरतीचा सन्मान देण्यात आला. ज्याची दखल युनोमध्येही घेण्यात आली.- खासदार विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया प्रा. लि.