शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

खैरेंच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहणार, आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ग्वाही देत वाद मिटल्याची केली घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:58 IST

एकमेकांवर चिखलफेक करत पाण्यात पाहणारे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हर्षवर्धन यांच्या समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचीत सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली.

ठळक मुद्देआ. जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत खा. खैरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.खैरे यांनी यापुढे जाधव हे केवळ शिवसेनेचे सत्कार स्विकारतील, असा आशावाद व्यक्त केला.

औरंगाबाद, दि. १४ : एकमेकांवर चिखलफेक करत पाण्यात पाहणारे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हर्षवर्धन यांच्या समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचीत सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली. आ. जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत खा. खैरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले. तर खैरे यांनी यापुढे जाधव हे केवळ शिवसेनेचे सत्कार स्विकारतील, असा आशावाद व्यक्त केला.

शिवसेनेतर्फे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत निवडूण आलेल्या सरपंच आणि सदस्यांच्या सत्काराचे आयोजन तापडिया नाट्यगृहात केले होते. या कार्यक्रमाला अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. खा.खैरे यांच्या हस्ते शिवसेना प्रणित गटाकडून निवडूण आलेल ९६ सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संजय सिरसाठ, हर्षवर्धन जाधव, जि. प. अध्यक्षा देवयाणी डोणगावकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, सुहास दशरथे, महापौर पदाचे उमेदवार नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनिता आऊलवार, रंजना कुलकर्णी आदी  उपस्थित होते.

या सत्कार समारंभात आ. जाधव यांची उपस्थिती सर्वांनाच कोड्यात टाकणारी होती. आ. जाधव यांनी सर्वात अगोदर बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी आता सर्व वाद निकाली निघाले असल्याचे सांगताच नाट्यगृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला. शिवसेनेच्या निवडून आलेल्या कन्नड तालुक्यातील सरपंचांना प्रत्येक पाच लाख रूपयांचा आमदार फंड देणार असल्याचे सांगितले. मध्यंतरी खैरे यांच्यासोबत नाराजी होती. त्याची कारणे वेगळी आहेत. ती नाराजी मातोश्रीवर गेल्यामुळे दूर झाली आहे. आता लोकसभा निडणूकीच्या वेळी खैरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही जाधव यांनी दिली.

आमदार सिरसाठ यांनीही शिवसेनेला अंतर्गत कुरघोडीच्या घटना नविन नसल्याचे सांगितले. उलट आ. जाधव यांनी लवकर कळले. तरी कधी खैरे-कदम, खैरे-सिरसाठ, सिरसाठ-दानवे असा संघर्ष झाल्याचे रंगविले जात असल्याचे सिरसाठ म्हणाले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरपंच निवडणूकीत शिवसेनाच वरचढ ठरल्याचे सांगितले. सरपंचाचा आकडा लवकरच १०० पेक्षा अधिक होईल. सध्या ९६ सरपंच शिवसेनेत आहेत. आणखी पाच-सहा जणांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही दानवे म्हणाले. 

शेवटी बोलताना खैरे म्हणाले, ब-याच दिवसांनी पुन्हा सामिल झालेले हर्षवर्धन जाधव यांनी आता शिवसेनेचे सत्कार स्विकारावेत. दुस-या पक्षाच्या मंचावर जाण्याची त्यांना गरज नसल्याचे सांगितले. पक्षात भांडणे चांगली असतात. नुकतीच दोघींची भांडणे (महिला पदाधिका-यांची हाणामारी) झाली होती, या घटनेची आठवणही खैरे यांनी यावेळी करून दिली.

उदयसिंग राजपूत यांचे काय होणार?कन्नड विधानसभाचे आमदार जाधव यांनी उघडपणे बंड केल्यामुळे खा. खैरे यांनी त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीतुन उदयसिंग राजपूत यांना शिवसेनेत आणले. सरपंचांच्या सत्कार समारंभात मंचावर राजपूत उपस्थित होते. मात्र, आता जाधव व खैरे यांनीच मतभेद संपल्याचे जाहीर केल्यामुळे राजपूत यांचे काय होणार? अशी कुजबूज  कार्यक्रमस्थळी होती.

शिवसेना भवनातुन तंबीजिल्हा शिवसेना शाखेतर्फे आयोजित सरपंचांच्या कार्यक्रमाला सुरूवातीला आ. जाधव यांनी बोलावण्यात आले नव्हते. मात्र शिवसेना भवनातून तंबी मिळाल्यामुळे आ. जाधव यांना बोलावण्यात आले. त्यामुळे खा. खैरे यांचाही नाईलाज झाला. शेवटी आ. जाधव यांना सन्मानाने बोलवावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले. 

काय होता वादखा. खैरे  यांनी कन्नड तालुक्यातील चार गावात निधी दिला. मात्र हा निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च झालाच नसल्याचा आरोप आ. जाधव यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी चौकशीची मागणीही केली होती. त्याविषयीची पत्रकेही काढली होती. तर शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी खा. खैरे यांच्या बाजूने वादात उडी घेत आ. जाधव यांनीच आमदार निधी कामे  न करताच उचलला असल्याची तक्रार जिल्हाधिका-यांकडे केली होती.