शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

खैरेंच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहणार, आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ग्वाही देत वाद मिटल्याची केली घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:58 IST

एकमेकांवर चिखलफेक करत पाण्यात पाहणारे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हर्षवर्धन यांच्या समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचीत सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली.

ठळक मुद्देआ. जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत खा. खैरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.खैरे यांनी यापुढे जाधव हे केवळ शिवसेनेचे सत्कार स्विकारतील, असा आशावाद व्यक्त केला.

औरंगाबाद, दि. १४ : एकमेकांवर चिखलफेक करत पाण्यात पाहणारे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हर्षवर्धन यांच्या समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचीत सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली. आ. जाधव यांनी आगामी लोकसभा निवडणूकीत खा. खैरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले. तर खैरे यांनी यापुढे जाधव हे केवळ शिवसेनेचे सत्कार स्विकारतील, असा आशावाद व्यक्त केला.

शिवसेनेतर्फे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत निवडूण आलेल्या सरपंच आणि सदस्यांच्या सत्काराचे आयोजन तापडिया नाट्यगृहात केले होते. या कार्यक्रमाला अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. खा.खैरे यांच्या हस्ते शिवसेना प्रणित गटाकडून निवडूण आलेल ९६ सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार संजय सिरसाठ, हर्षवर्धन जाधव, जि. प. अध्यक्षा देवयाणी डोणगावकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, सुहास दशरथे, महापौर पदाचे उमेदवार नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनिता आऊलवार, रंजना कुलकर्णी आदी  उपस्थित होते.

या सत्कार समारंभात आ. जाधव यांची उपस्थिती सर्वांनाच कोड्यात टाकणारी होती. आ. जाधव यांनी सर्वात अगोदर बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी आता सर्व वाद निकाली निघाले असल्याचे सांगताच नाट्यगृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला. शिवसेनेच्या निवडून आलेल्या कन्नड तालुक्यातील सरपंचांना प्रत्येक पाच लाख रूपयांचा आमदार फंड देणार असल्याचे सांगितले. मध्यंतरी खैरे यांच्यासोबत नाराजी होती. त्याची कारणे वेगळी आहेत. ती नाराजी मातोश्रीवर गेल्यामुळे दूर झाली आहे. आता लोकसभा निडणूकीच्या वेळी खैरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही जाधव यांनी दिली.

आमदार सिरसाठ यांनीही शिवसेनेला अंतर्गत कुरघोडीच्या घटना नविन नसल्याचे सांगितले. उलट आ. जाधव यांनी लवकर कळले. तरी कधी खैरे-कदम, खैरे-सिरसाठ, सिरसाठ-दानवे असा संघर्ष झाल्याचे रंगविले जात असल्याचे सिरसाठ म्हणाले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरपंच निवडणूकीत शिवसेनाच वरचढ ठरल्याचे सांगितले. सरपंचाचा आकडा लवकरच १०० पेक्षा अधिक होईल. सध्या ९६ सरपंच शिवसेनेत आहेत. आणखी पाच-सहा जणांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही दानवे म्हणाले. 

शेवटी बोलताना खैरे म्हणाले, ब-याच दिवसांनी पुन्हा सामिल झालेले हर्षवर्धन जाधव यांनी आता शिवसेनेचे सत्कार स्विकारावेत. दुस-या पक्षाच्या मंचावर जाण्याची त्यांना गरज नसल्याचे सांगितले. पक्षात भांडणे चांगली असतात. नुकतीच दोघींची भांडणे (महिला पदाधिका-यांची हाणामारी) झाली होती, या घटनेची आठवणही खैरे यांनी यावेळी करून दिली.

उदयसिंग राजपूत यांचे काय होणार?कन्नड विधानसभाचे आमदार जाधव यांनी उघडपणे बंड केल्यामुळे खा. खैरे यांनी त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीतुन उदयसिंग राजपूत यांना शिवसेनेत आणले. सरपंचांच्या सत्कार समारंभात मंचावर राजपूत उपस्थित होते. मात्र, आता जाधव व खैरे यांनीच मतभेद संपल्याचे जाहीर केल्यामुळे राजपूत यांचे काय होणार? अशी कुजबूज  कार्यक्रमस्थळी होती.

शिवसेना भवनातुन तंबीजिल्हा शिवसेना शाखेतर्फे आयोजित सरपंचांच्या कार्यक्रमाला सुरूवातीला आ. जाधव यांनी बोलावण्यात आले नव्हते. मात्र शिवसेना भवनातून तंबी मिळाल्यामुळे आ. जाधव यांना बोलावण्यात आले. त्यामुळे खा. खैरे यांचाही नाईलाज झाला. शेवटी आ. जाधव यांना सन्मानाने बोलवावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले. 

काय होता वादखा. खैरे  यांनी कन्नड तालुक्यातील चार गावात निधी दिला. मात्र हा निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च झालाच नसल्याचा आरोप आ. जाधव यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी चौकशीची मागणीही केली होती. त्याविषयीची पत्रकेही काढली होती. तर शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी खा. खैरे यांच्या बाजूने वादात उडी घेत आ. जाधव यांनीच आमदार निधी कामे  न करताच उचलला असल्याची तक्रार जिल्हाधिका-यांकडे केली होती.