शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

अवैध प्रवासी वाहतूकदारांची कोंडी

By admin | Updated: September 25, 2016 00:47 IST

अवैध वाहतुकीविरोधात राज्याच्या परिवहन विभागाने कठोर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. २0१५ पासून कारवाईचा वेग वाढला असून मे महिन्यापर्यंत तब्बल ६३ हजार अवैध

मुंबई : अवैध वाहतुकीविरोधात राज्याच्या परिवहन विभागाने कठोर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. २0१५ पासून कारवाईचा वेग वाढला असून मे महिन्यापर्यंत तब्बल ६३ हजार अवैध प्रवासी वाहनांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यात जवळपास २५ टक्के वाढ झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहने धावत असल्याने सार्वजनिक वाहतूक सेवांवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो. त्याचा सर्वात मोठा फटका एसटी महामंडळाला बसत असून प्रवासी आणि उत्पन्न कमी झाल्याची ओरड केली जाते. अवैध वाहतुकीमुळे तर कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्याचे एसटी महामंडळाकडून सातत्याने सांगण्यात येते. एकूणच गांभीर्य लक्षात घेऊन आरटीओकडून २0१५ पासून अवैध वाहतुकीविरोधात कारवाईचा वेग वाढवल्याचे दिसते. अवैध प्रवासी वाहनांविरोधात कारवाई करण्यासाठी सध्या राज्याकरिता आरटीओकडे ५९ वायुवेग पथके आहेत. मोटार वाहनांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रस्त्यावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने आरटीओच्या वायुवेग पथकाच्या कामगिरीत वाढही झालेली आहे. २0१५ पासून ते २0१६ मे महिन्यापर्यंत करण्यात आलेल्या तपासणीत २ लाख ३४ हजार १७४ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६३ हजार ११५ अवैध प्रवासी वाहने असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरोधात केलेल्या कारवाईतून ३४ कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. २0१४-१५ मध्ये दोषी आढळलेल्या वाहनांचा आकडा हाच ३८ हजार ४0१ एवढा होता. त्यामुळे तुलनात्मक पाहता २५ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)१ लाख ५३ हजार ३९९ वाहनांची तपासणी- आरटीओच्या ठाणे, सातारा, पुणे, नाशिक, वाशिम, पनवेल, पेण, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, लातूर, यवतमाळ विभागात सर्वाधिक कारवाई अवैध प्रवासी वाहनांविरोधात करण्यात आली आहे.- २00६-0७ साली जवळपास १ लाख ५३ हजार ३९९ वाहने तपासण्यात आली होती. त्यात ४१ हजार १५८ वाहने दोषी आढळली होती. हाच कारवाईचा आकडा आता वाढला आहे.- राज्यातील वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त वायुवेग पथके निर्माण करण्याचेही परिवहन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.