मुंबई : अनेकदा अनेक शिक्षक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवितात. अशा उपक्रमांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि आयआयएम (इंडियन इन्स्टिटय़ूट्स ऑफ मॅनेजमेंट) अहमदाबाद यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार अलीकडेच मुंबईत झाला.
शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या करारावर विभागाच्या सचिव अश्विनी भिडे आणि विद्या परिषदेचे संचालक एन. के. जरग यांनी तर आयआयएम अहमदाबादच्या वतीने व्यवस्थापक (इनोव्हेशन) अविनाश भंडारी यांनी स्वाक्ष:या केल्या.
या करारांतर्गत आयआयएम अहमदाबादच्या वतीने एमएससीईआरटी, डाएट आणि शिक्षकांना नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
या उपक्रमांची गुणवत्ता आणि उपयोगिता तपासणो, त्यांना व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देऊन शिक्षकांना प्रोत्साहित करणो, पोर्टल तयार करणो, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणा:या शिक्षकांचे जाळे निर्माण करणो, काही उपक्रमांच्या आधारे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाला शिफारस करणो यासाठी हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे शिक्षकांना प्रगतीचे नवे क्षितिज मिळेल, असा विश्वास राजेंद्र दर्डा यांनी या वेळी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)