शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

‘आयआयएम’ औरंगाबादेतच होणार!

By admin | Updated: November 23, 2014 01:57 IST

पातळीवरील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबादेतच सुरू होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

विजय सरवदे - औरंगाबाद
पातळीवरील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) औरंगाबादेतच सुरू होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील एक स्वतंत्र इमारत देण्याची तयारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दर्शवली आहे.
केंद्र शासनाने अर्थसंकल्पामध्येच महाराष्ट्रासह देशात पाच ठिकाणी  ‘आयआयएम’च्या उभारणीची घोषणा केली होती. त्यानंतर मराठवाडय़ाची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये ही संस्था सुरू व्हावी, यासाठी राजेंद्र दर्डा, अशोक चव्हाण, राजीव सातव, चंद्रकांत खैरे, उद्योजक मुनीष शर्मा, राम भोगले, विवेक देशपांडे याशिवाय अन्य राजकीय नेत्यांनी मागणी लावून धरली होती. संस्थेला सुमारे दोनशे एकर जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने औरंगाबादसह नागपूर, पुणो विभागांकडूनही प्रस्ताव मागविले आहेत. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी अब्दीमंडी, करोडी तसेच ‘डीएमआयसी’साठी संपादित केलेल्या जागेचा प्रस्तावही उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पाठविलेला आहे. 
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण सचिव संजय चहांदे तसेच जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी शनिवारी कुलगुरू डॉ. चोपडे यांच्याकडे ‘आयआयएम’साठी पायाभूत सुविधा देण्याबाबत विचारणा केली. तेव्हा कुलगुरूंनी यासंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन निर्णय कळवितो, असे त्यांना सांगितले. त्यानंतर तात्काळ डॉ. शिवाजी मदन, डॉ. अशोक मोहेकर, डॉ.वसंत सानप, डॉ. दत्तात्रय आघाव, डॉ. प्रमिला जाधव या ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्यांना कुलगुरूंनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. विद्यापीठात ‘आयआयएम’सारखी राष्ट्रीय संस्था सुरू होत असेल, तर ते मराठवाडय़ाचे भाग्य आहे, या शब्दात या सदस्यांनी आपली भावना कळवली.