शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतविषयक समस्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 9, 2016 02:20 IST

जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, काबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत

करंजगाव : नाणे मावळातील जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, काबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या-वस्त्यांवर विद्युत समस्या मोठ्या प्रमाणात असून, महावितरण त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी तक्रार नाणे मावळातील ग्रामस्थ करीत आहेत. काही ठिकाणी विद्युत खांब वाकलेले आहेत. तसेच काही गावात डीपी उघड्या आहेत. काही डीपींचे दरवाजे खाली पडले आहेत. काहींमधील फ्यूज खराब झाले असल्याने वारंवार विद्युतपुरवठा खंडित होतो. काही ठिकाणी थेट वायर जोडल्या आहेत. तेथे फ्यूज लावणे आवश्यक आहे. पावसाळ्यात तेथील स्थिती खूप धोकादायक बनू शकते. पावसाळ्यात विद्युतप्रवाह कमी-जास्त होत असल्यामुळे अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे खराब होतात. अनेकदा दिवसातून दहा-दहा वेळा पुरवठा खंडित होतो. वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे कर्मचारी चौकशीसुद्धा करीत नाहीत. कर्मचारी अरेरावीची उतरे देतात. सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी कामे करण्यास टाळाटाळ करतात. मीटर कनेक्शनसाठी विविध कारणे देत हेलपाटे मारायला लावतात. गावामध्ये आल्यावर गावात विद्युतविषयक समस्यांकडे ते लक्ष देत नाहीत.अनेक डीपी बॉक्सला दरवाजे नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्युत खांब, विद्युतवाहक तारा, डीपीचे फ्यूज व्यवस्थित करावेत. गावांमधील विद्युत समस्यांची पाहणी शाखा अभियंता व कर्मचारी यांनी करून ग्रामीण भागातील विद्युतपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)नवीन मीटर बसवण्यासाठी ग्राहकांना सुरुवातीला आपली कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी कर्मचारी आपल्या मर्जीनुसार कागदपत्रे साहेबांच्या टेबलवर ठेवतात. गुरुवार भारनियमनाचा वार असल्याने आणि रविवारी असल्याने इतर दिवशी वीज मीटरच्या कोटेशनवर स्वाक्षरी केली जाते. स्वाक्षरी केल्यानंतर तेच कोटेशन बँकेत भरले जाते. कोटेशन भरल्यानंतर पुन्हा सहायक अभियंता यांच्याकडे दिले जाते. परंतु, मीटरसाठी महावितरण कार्यालयाकडे एक ते दोन महिने हेलपाटे मारावे लागतात. हेलपाटे मारूनही कर्मचारी दाद देत नाहीत.