शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यावर उपसभापतींचा ‘डबल अटॅक’

By योगेश पांडे | Updated: December 19, 2024 00:04 IST

Maharashtra Assembly Winter Session: सभापती पदाची निवडणूक एका दिवसावर आली असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

- योगेश पांडे नागपूर - सभापती पदाची निवडणूक एका दिवसावर आली असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. एरवी संयमाने स्थिती हाताळणाऱ्या डॉ. गोऱ्हे यांचा हा पवित्रा पाहून सभागृहातील इतर सदस्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. मात्र, संबंधित घटना ही संसदेत झाली असून, विधानपरिषदेच्या सभागृहाशी त्याचा काहीही संबंध नाही. नियमानुसार एका सभागृहातील घटनेची चर्चा दुसऱ्या सभागृहात होत नाही या नियमावर उपसभापतींनी बोट ठेवले. यावरून विरोधक आक्रमक झाले. दानवे, अनिल परब यांच्यासह विरोधकांनी या मुद्यावर चर्चेचा आग्रह धरला. मात्र, उपसभापतींनी बोलण्याची परवानगी नाकारली व विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावर डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या.

बाबासाहेबांबाबत सरकार व सभागृहातील प्रत्येक सदस्याला आदर आहे. कार्यक्रम पत्रिका ठरवत असताना विचारले होते तेव्हा कुणी बोलत नाही व ज्या गोष्टींवर चर्चा होऊ शकत नाही त्यावर वाद घालता. तुम्ही अभ्यासू सदस्य असून सर्व नियम जाणता. सकाळी आल्यापासून नियम विचारता. पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर जाऊन आंदोलन करा. याला राजकारण म्हणत नाहीत. सभागृहात बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करणे मान्य नाही. बाबासाहेबांसाठी सभागृह बंद केले असा चुकीचा संदेश तुम्हाला बाहेर द्यायचा आहे अशा शब्दांत उपसभापतींनी विरोधकांना सुनावले. गोंधळ सुरूच असताना त्यांनी पुढील कामाला सुरुवात केली. यामुळे विरोधकांनी सभात्याग करून निषेध नोंदविला.

बाबासाहेबांच्या नावावर राजकारण का करता?बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा मुद्दा मांडला होता व आता पंतप्रधान समान नागरी कायद्याचा उल्लेख करत आहेत. बाबासाहेबांमुळे अनेक कुप्रथा गेल्या. त्यांच्यामुळेच आम्ही सभागृहात आहोत. मात्र, विरोधक चुकीच्या गोष्टी करून जनता व सभागृहाची दिशाभूल करत आहेत. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करणे चुकीचे आहे. लोकांच्या भावनांवर तुम्ही तेल ओतू नका. आम्ही नामांतराच्या आंदोलनात तुरुंगात गेलो होते. तुमच्यापैकी कुणीही आत गेले नव्हते. बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करू नका, या शब्दांत उपसभापतींनी कान टोचले.

रेकॉर्डवर निषेध न येऊ देण्याचा उपसभापतींचा प्रयत्न : दानवेगृहमंत्र्यांचे उद्गार हे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणारे आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मुद्दा राज्यातील सभागृहात उपस्थित केला जातो, मग गृहमंत्री यांच्या उद्गाराचा मुद्दा का उपस्थित केला जात नाही असा सवाल दानवे यांनी केला. सभागृहात आम्ही निषेध व्यक्त केला असता ते रेकॉर्डवर यावे यासाठीच उपसभापतींनी वेगळी भूमिका घेतल्याचा दावा दानवे यांनी केला.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidhan Parishadविधान परिषदNeelam gorheनीलम गो-हे