शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यावर उपसभापतींचा ‘डबल अटॅक’

By योगेश पांडे | Updated: December 19, 2024 00:04 IST

Maharashtra Assembly Winter Session: सभापती पदाची निवडणूक एका दिवसावर आली असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

- योगेश पांडे नागपूर - सभापती पदाची निवडणूक एका दिवसावर आली असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. एरवी संयमाने स्थिती हाताळणाऱ्या डॉ. गोऱ्हे यांचा हा पवित्रा पाहून सभागृहातील इतर सदस्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. मात्र, संबंधित घटना ही संसदेत झाली असून, विधानपरिषदेच्या सभागृहाशी त्याचा काहीही संबंध नाही. नियमानुसार एका सभागृहातील घटनेची चर्चा दुसऱ्या सभागृहात होत नाही या नियमावर उपसभापतींनी बोट ठेवले. यावरून विरोधक आक्रमक झाले. दानवे, अनिल परब यांच्यासह विरोधकांनी या मुद्यावर चर्चेचा आग्रह धरला. मात्र, उपसभापतींनी बोलण्याची परवानगी नाकारली व विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावर डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या.

बाबासाहेबांबाबत सरकार व सभागृहातील प्रत्येक सदस्याला आदर आहे. कार्यक्रम पत्रिका ठरवत असताना विचारले होते तेव्हा कुणी बोलत नाही व ज्या गोष्टींवर चर्चा होऊ शकत नाही त्यावर वाद घालता. तुम्ही अभ्यासू सदस्य असून सर्व नियम जाणता. सकाळी आल्यापासून नियम विचारता. पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर जाऊन आंदोलन करा. याला राजकारण म्हणत नाहीत. सभागृहात बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करणे मान्य नाही. बाबासाहेबांसाठी सभागृह बंद केले असा चुकीचा संदेश तुम्हाला बाहेर द्यायचा आहे अशा शब्दांत उपसभापतींनी विरोधकांना सुनावले. गोंधळ सुरूच असताना त्यांनी पुढील कामाला सुरुवात केली. यामुळे विरोधकांनी सभात्याग करून निषेध नोंदविला.

बाबासाहेबांच्या नावावर राजकारण का करता?बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा मुद्दा मांडला होता व आता पंतप्रधान समान नागरी कायद्याचा उल्लेख करत आहेत. बाबासाहेबांमुळे अनेक कुप्रथा गेल्या. त्यांच्यामुळेच आम्ही सभागृहात आहोत. मात्र, विरोधक चुकीच्या गोष्टी करून जनता व सभागृहाची दिशाभूल करत आहेत. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करणे चुकीचे आहे. लोकांच्या भावनांवर तुम्ही तेल ओतू नका. आम्ही नामांतराच्या आंदोलनात तुरुंगात गेलो होते. तुमच्यापैकी कुणीही आत गेले नव्हते. बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करू नका, या शब्दांत उपसभापतींनी कान टोचले.

रेकॉर्डवर निषेध न येऊ देण्याचा उपसभापतींचा प्रयत्न : दानवेगृहमंत्र्यांचे उद्गार हे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणारे आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मुद्दा राज्यातील सभागृहात उपस्थित केला जातो, मग गृहमंत्री यांच्या उद्गाराचा मुद्दा का उपस्थित केला जात नाही असा सवाल दानवे यांनी केला. सभागृहात आम्ही निषेध व्यक्त केला असता ते रेकॉर्डवर यावे यासाठीच उपसभापतींनी वेगळी भूमिका घेतल्याचा दावा दानवे यांनी केला.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidhan Parishadविधान परिषदNeelam gorheनीलम गो-हे