शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यावर उपसभापतींचा ‘डबल अटॅक’

By योगेश पांडे | Updated: December 19, 2024 00:04 IST

Maharashtra Assembly Winter Session: सभापती पदाची निवडणूक एका दिवसावर आली असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

- योगेश पांडे नागपूर - सभापती पदाची निवडणूक एका दिवसावर आली असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांची चांगलीच खरडपट्टी काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण का करता, असा सवाल उपस्थित करत पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर आंदोलन करा, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. एरवी संयमाने स्थिती हाताळणाऱ्या डॉ. गोऱ्हे यांचा हा पवित्रा पाहून सभागृहातील इतर सदस्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. मात्र, संबंधित घटना ही संसदेत झाली असून, विधानपरिषदेच्या सभागृहाशी त्याचा काहीही संबंध नाही. नियमानुसार एका सभागृहातील घटनेची चर्चा दुसऱ्या सभागृहात होत नाही या नियमावर उपसभापतींनी बोट ठेवले. यावरून विरोधक आक्रमक झाले. दानवे, अनिल परब यांच्यासह विरोधकांनी या मुद्यावर चर्चेचा आग्रह धरला. मात्र, उपसभापतींनी बोलण्याची परवानगी नाकारली व विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावर डॉ. नीलम गोऱ्हे संतापल्या.

बाबासाहेबांबाबत सरकार व सभागृहातील प्रत्येक सदस्याला आदर आहे. कार्यक्रम पत्रिका ठरवत असताना विचारले होते तेव्हा कुणी बोलत नाही व ज्या गोष्टींवर चर्चा होऊ शकत नाही त्यावर वाद घालता. तुम्ही अभ्यासू सदस्य असून सर्व नियम जाणता. सकाळी आल्यापासून नियम विचारता. पराभवाचे शल्य लपवायचे असेल तर बाहेर जाऊन आंदोलन करा. याला राजकारण म्हणत नाहीत. सभागृहात बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करणे मान्य नाही. बाबासाहेबांसाठी सभागृह बंद केले असा चुकीचा संदेश तुम्हाला बाहेर द्यायचा आहे अशा शब्दांत उपसभापतींनी विरोधकांना सुनावले. गोंधळ सुरूच असताना त्यांनी पुढील कामाला सुरुवात केली. यामुळे विरोधकांनी सभात्याग करून निषेध नोंदविला.

बाबासाहेबांच्या नावावर राजकारण का करता?बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा मुद्दा मांडला होता व आता पंतप्रधान समान नागरी कायद्याचा उल्लेख करत आहेत. बाबासाहेबांमुळे अनेक कुप्रथा गेल्या. त्यांच्यामुळेच आम्ही सभागृहात आहोत. मात्र, विरोधक चुकीच्या गोष्टी करून जनता व सभागृहाची दिशाभूल करत आहेत. बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करणे चुकीचे आहे. लोकांच्या भावनांवर तुम्ही तेल ओतू नका. आम्ही नामांतराच्या आंदोलनात तुरुंगात गेलो होते. तुमच्यापैकी कुणीही आत गेले नव्हते. बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर करू नका, या शब्दांत उपसभापतींनी कान टोचले.

रेकॉर्डवर निषेध न येऊ देण्याचा उपसभापतींचा प्रयत्न : दानवेगृहमंत्र्यांचे उद्गार हे संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणारे आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मुद्दा राज्यातील सभागृहात उपस्थित केला जातो, मग गृहमंत्री यांच्या उद्गाराचा मुद्दा का उपस्थित केला जात नाही असा सवाल दानवे यांनी केला. सभागृहात आम्ही निषेध व्यक्त केला असता ते रेकॉर्डवर यावे यासाठीच उपसभापतींनी वेगळी भूमिका घेतल्याचा दावा दानवे यांनी केला.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidhan Parishadविधान परिषदNeelam gorheनीलम गो-हे