शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

शेतमालाला ‘आधारभूत’ भाव न दिल्यास गुन्हा!

By admin | Updated: May 4, 2017 05:18 IST

राज्यात शेतकऱ्यांकडून आधारभूत भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणे गुन्हा ठरणार असून, त्या संदर्भात राज्य सरकार

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांकडून आधारभूत भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी  करणे गुन्हा ठरणार असून, त्या संदर्भात  राज्य सरकार कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या गट शेतीच्या आढावा बैठकीत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या घोषणनुसार, कायदा झाल्यास आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील. अलीकडे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून तीन-साडेतीन हजार रुपये क्विंटलने तूरखरेदी करून तीच तूर नंतर ५ हजार ५० रुपये भावाने नाफेडला विकण्याचे प्रकार घडले. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी सदर घोषणा केली आहे. जाणकारांच्या मते, असा कायदा झाल्यास व्यापारी आयात कृषिमाल कमी किमतीने खरेदी करतील आणि शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करणार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणाच्या अनुषंगानेच राज्याला कायदा करावा लागणार आहे. मुख्यमंत्री आजच्या बैठकीत गट शेतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ही शेती ही शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. गटांच्या माध्यमातून भौगोलिक परिस्थितीनुसार कृषी उत्पादन घ्यावे. या उत्पादनाला पूरक अशी यंत्रणा एकाच छताखाली उपविभागीय स्तरावर निर्माण करावी. गोदाम, शीतगृह यांची उपलब्धता उपविभागीय स्तरावर निर्माण झाल्यास नाशवंत कृषी उत्पादनाला त्याचा फायदा होऊ शकेल. बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी,  सचिव मिलिंद म्हैसकर, इस्राइलचे कॉन्सुलेट जनरल डेव्हिड अकोव्ह यांच्यासह गट  शेतीचा प्रयोग राबविणारे तज्ज्ञ आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी) सूक्ष्म सिंचनाखालील ऊसासाठी व्याज सवलतऊसाचे क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याकरिता व्याज सवलत योजनेलादेखील या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत त्या संदर्भात प्रस्ताव करण्यात येणार आहे. गटशेती धोरणाला मान्यतागट शेतीला चालना मिळण्याकरिता तयार करण्यात आलेल्या धोरणाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले. या धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.