शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Maharashtra Election 2019 : पहिलवान तयार असेल तर मोदी-शहांना का आणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 06:53 IST

शरद पवार यांची टीका : राज्याची आर्थिक स्थिती बिघडल्याकडे वेधले लक्ष

मुंबई : पहिलवान तयार आहे. विरोधी कोणी नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात, तर मोदी-शहासह इतरांना प्रचाराला का आणता? असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत मुंबईतील पहिल्या सभेला सुरुवात केली. तर दुसरीकडे भाजप-सेनेमध्ये एकवाक्यता न राहिल्याने, महाराष्ट्राची स्थिती बिघडत असून, राज्याचे नुकसान होत असल्याची टीका पवार यांनी केली.

कांजूर दातार कॉलनी येथे विक्रोळी विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांच्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. ही निवडणूक महाष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. लोकसभेची निवडणूक झाली. त्याचे विषय वेगवेगळे आहेत. शेजारच्या राष्ट्राने अतिरेकी हल्ला केला, त्याला देशाने उत्तर दिले. त्या बळावर त्यांनी लोकसभा जिंकली, पण ही महाराष्ट्राची निवडणूक आहे. येथील वेगवेगळे विषय आहेत. राज्यात अतिवृष्टी झाली, कोरडा दुष्काळ झाला, तर १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्र वेगळा झाला, तेव्हा सर्व मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक वसाहती धोरण निश्चित केले. हजारो हातांना काम दिले, पण गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, पण ५० टक्के कारखाने बंद आहे. कृषी, औद्योगिक सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्र एकवर होता, पण आता ती स्थिती राहिलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सेना भाजपचे राज्य आहे, पण राज्य एका विचाराने चालवावे लागते, पण त्या दोघांमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. मुख्यमंत्री, सेनाप्रमुख वेगवेगळे विचार, भूमिका मांडतात. राज्य चालविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्यात एकवाक्यता नसेल, तर प्रशासनावर त्यांचे नियंत्रण राहत नाही. मी ५२ वर्षे काम केले आहे. प्रशासन यंत्रणेवर सरकारचं नियंत्रण नसेल, तर आपण अधोगतीकडे जातो. उद्धव ठाकरे उद्या माझ्यावर टीका करतीलच. त्यांना त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा लाभला. म्हणून त्यांना मिळालेल्या जबाबदारीचे मूल्य नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातअसे नव्हते. सध्या परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकत्र विचार केला, म्हणून आम्ही एकजुटीने राहून राज्य करू. आम्हाला निवडून द्या, असे पवार म्हणाले.गुन्हेगारीचा विचार करण्याची गरज!देशात गुन्हे वाढत आहे. हे केंद्र सरकारने सादर केलेल्या गुन्हे अहवालात हत्या, बलात्कारामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. याचे दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे, राजकर्त्यांचा प्रशासनावर नियंत्रण नाही, तर दुसरे तरुण पिढीचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. याचा सरकारने विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार