शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी मोदींसाठी शोकसभा घ्यावी लागली असती - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: January 1, 2016 16:21 IST

दहशतवाद्यांकडून धोका असतानाही शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकमध्ये गेले, त्यांना तेथे काही झाले असते तर आपल्याला पाडगावकरांच्या आधी त्यांना श्रद्धांजली वहावी लागली असती.

पुणे, दि. १ -  संघाची पार्श्‍वभूमी असलेले पंतप्रधान मोदी काबूलवरून अचानक पाकिस्तानात नवाझ शरीफ यांचा पुळका आला म्हणून गेले नव्हते, तर राष्ट्रहितासाठी त्यांनी तो निर्णय घेतला, मात्र याच मोदींची पंतप्रधानपदाआधीची गोध्रा हत्याकांड काळातील मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द कलंकित आहे. पण पंतप्रधानपदी आल्यानंतर मोदी गौतम बुद्ध, महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान सांगत जगातील दहशतवाद कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अमेरिका-चीनशी मैत्री करीत आहेत. शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोदी तळहातावर शीर घेऊन पाकमध्ये गेले. दहशतवाद्यांकडून त्यांच्या जिवास धोका होता, त्यांना कोणाचीही गोळी लागू शकली असती. तसे असते एका दिवसात ते संपले असते आणि आपल्याला मंगेश पाडगावकरांच्या आधीच नरेंद्र मोदींसाठी शोकसभा घ्यावी लागली असती... असे खळबळजक विधान नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष मोहन देशमुख, पिंपरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, प्राचार्य नितीन घोरपडे, अमृता गुलाटी आदी या वेळी उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान समन्वय आणि संवादाबाबत त्यांनी पंतप्रधानांचे उदाहरण देताना त्यांनी त्यांच्या पाकिस्तानच्या दौ-याचा उल्लेख करत त्यांनी तेथील धोक्याची कल्पना दिली. जीवाला एवढा धोका असतानाही मोदी तेथे गेले. मोदी एवढे समर्पण करणारी व्यक्ती असून त्यांचा पक्ष, विचार बाजूला ठेवून आपल्याला सुसंवाद केला पाहिजे, असे सबनीस म्हणाले. 'संघर्षाच्या जागांचा अपवाद करून आता संवादाकडे वळले पाहिजे, त्याचाच भाग म्हणून गुलाम अलींसारख्या पाकिस्तानी कलाकारांना आपल्याकडे कार्यक्रम करू द्यायला हवे' असेही त्यांनी सांगितले.