शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती नाही तर मग आत्महत्या कशा थांबणार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 22, 2015 11:50 IST

कर्जमाफीमुळे शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नसतील तर मग कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २२ - शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावण्याचा कणखरपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवला असला तरी कणा मोडून बसलेल्या लाखो शेतक-यांचे जीवन ते कसे उभे करणार, शेतक-यांच्या आत्महत्या कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारला फटकारले आहे. शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी ही आमची मागणी आहे, चोर- चिलटे, गुन्हेगारांना माफी दिली जाते, शेतकरी हा गुन्हेगार नाही तो राजा आहे, पण निसर्गाची अवकृपा व सरकारची चुकलेली धोरणे यामुळे तो भिकारी बनला आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राजकारणी, मंत्री व नोकरशहा यांचे उत्पन्न वाढते, सरकार व बँकांना डुबवणा-या उद्योगपतींना पुन्हा कर्ज मिळते, पण शेतकरी या सर्वात बसत नसल्याने तो उपाशी आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातला शेतकरी कधीच लुळापांगळा झाला असून तो कसाबसा कुबड्या घेऊन उभा राहण्याचा प्रयत्न  सुरु आहेत हे मुख्यमंत्र्यांचे विधान मान्य केले तर त्याला स्वत:च्या पायावर उभे कसे करणार? कर्जमुक्तीच्या प्रश्‍नाने आत्महत्या थांबणार नसतील तर त्या कोणत्या उपायाने थांबतील? अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी फडणवीस सरकारवर केली आहे.