शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कर्जमुक्ती नाही तर मग आत्महत्या कशा थांबणार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 22, 2015 11:50 IST

कर्जमाफीमुळे शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नसतील तर मग कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २२ - शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावण्याचा कणखरपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवला असला तरी कणा मोडून बसलेल्या लाखो शेतक-यांचे जीवन ते कसे उभे करणार, शेतक-यांच्या आत्महत्या कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारला फटकारले आहे. शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी ही आमची मागणी आहे, चोर- चिलटे, गुन्हेगारांना माफी दिली जाते, शेतकरी हा गुन्हेगार नाही तो राजा आहे, पण निसर्गाची अवकृपा व सरकारची चुकलेली धोरणे यामुळे तो भिकारी बनला आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राजकारणी, मंत्री व नोकरशहा यांचे उत्पन्न वाढते, सरकार व बँकांना डुबवणा-या उद्योगपतींना पुन्हा कर्ज मिळते, पण शेतकरी या सर्वात बसत नसल्याने तो उपाशी आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातला शेतकरी कधीच लुळापांगळा झाला असून तो कसाबसा कुबड्या घेऊन उभा राहण्याचा प्रयत्न  सुरु आहेत हे मुख्यमंत्र्यांचे विधान मान्य केले तर त्याला स्वत:च्या पायावर उभे कसे करणार? कर्जमुक्तीच्या प्रश्‍नाने आत्महत्या थांबणार नसतील तर त्या कोणत्या उपायाने थांबतील? अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी फडणवीस सरकारवर केली आहे.