शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

कर्जमुक्ती नाही तर मग आत्महत्या कशा थांबणार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 22, 2015 11:50 IST

कर्जमाफीमुळे शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नसतील तर मग कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. २२ - शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावण्याचा कणखरपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवला असला तरी कणा मोडून बसलेल्या लाखो शेतक-यांचे जीवन ते कसे उभे करणार, शेतक-यांच्या आत्महत्या कशा थांबणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या कर्जमाफी देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारला फटकारले आहे. शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी ही आमची मागणी आहे, चोर- चिलटे, गुन्हेगारांना माफी दिली जाते, शेतकरी हा गुन्हेगार नाही तो राजा आहे, पण निसर्गाची अवकृपा व सरकारची चुकलेली धोरणे यामुळे तो भिकारी बनला आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राजकारणी, मंत्री व नोकरशहा यांचे उत्पन्न वाढते, सरकार व बँकांना डुबवणा-या उद्योगपतींना पुन्हा कर्ज मिळते, पण शेतकरी या सर्वात बसत नसल्याने तो उपाशी आहे असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातला शेतकरी कधीच लुळापांगळा झाला असून तो कसाबसा कुबड्या घेऊन उभा राहण्याचा प्रयत्न  सुरु आहेत हे मुख्यमंत्र्यांचे विधान मान्य केले तर त्याला स्वत:च्या पायावर उभे कसे करणार? कर्जमुक्तीच्या प्रश्‍नाने आत्महत्या थांबणार नसतील तर त्या कोणत्या उपायाने थांबतील? अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी फडणवीस सरकारवर केली आहे.