शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

युती न झाल्यास शिवसेनेची कोंडी

By admin | Updated: October 7, 2015 02:08 IST

केडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली तर दोन्ही पक्ष साधारणत: ९०-९५ जागा मिळवू शकतात. परंतु, ती झाली नाही तर मात्र, भाजपापेक्षाही त्याचा

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीकेडीएमसी निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली तर दोन्ही पक्ष साधारणत: ९०-९५ जागा मिळवू शकतात. परंतु, ती झाली नाही तर मात्र, भाजपापेक्षाही त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. त्यामुळे शिवसेनेची कोंडी जास्ती होणार आहे. त्याउलट भाजपाकडे सद्य:स्थितीला केवळ ९ नगरसेवक असल्याने गमवण्यासारखे काहीही नाही. शिवसेनेकडे सध्यातरी शिंदे पिता-पुत्र, एक आमदार रिंगणात असून भाजपाकडे मात्र ४ आमदार आणि १ खासदार अशी तगडी फळी आहे. त्यामुळे तुलनेने भाजपाकडे प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी पर्याय आहे.असे असले तरीही भाजपाच्या कल्याण पश्चिमेसह डोंबिवलीतील आमदारांवर मात्र निवडणुकीत युती होवो न होवो परंतु, अधिकाधिक जागांवर पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आहे. त्यावर त्यांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून आहे. या दोघांसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जास्तीतजास्त नगरसेवक फोडून जे वॉर्ड त्यांचे होते ते भाजपाकडे वळवण्यात आमदार किसन कथोरे कस लावत आहेत. यातून ते स्वत:चे वेगळेपण मुख्यमंत्र्यांना सिद्ध करण्यासाठी दंग आहेत. तर कल्याण पूर्वेतून आमदार गणपत गायकवाड स्वत:चे अस्तित्व टिकवून मुख्यमंत्र्यांकडून काहीना काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या मनसुब्यात आहेत. अशा सर्व परिस्थितीत भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनाही या चारही जणांवर वॉच ठेवून आगरी कार्ड वापरून पक्षाला यश मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस एक करावा लागत आहे. मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीत शुभसंदेश देण्यासाठी त्यांनी विकास परिषदेच्या व्यासपीठावर उघडउघडपणे शिवसेनेच्या खासदारावर टीका करून त्यांना अंगावर घेतले होते, हे सर्वांनाच ठावुक आहे. सेनेकडूनही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी इच्छुकांच्या मुलाखतींदरम्यान भाजपाच्या नेत्यांना नाव न घेता टोमणा मारला होता. तसेच कपिल पाटील यांच्या भाषणाचाही सेनेच्या खासदारांनी खरपूस समाचार घेतला होता. अशा पद्धतीने स्थानिक पातळीवर कुरघोडीचे राजकारण युतीत दिसून येत असल्याने वरिष्ठांच्या मर्जीनुसार जरी युती झाली तरीही ती येथील कार्यकर्त्यांना नको आहे. तर युती झाल्यास ९५ प्लस अशी परिस्थिती असेल. त्यामुळेच दोन्ही पक्षांनी मुलाखतींदरम्यान सर्व जागांसाठीच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट आहे. दोन्ही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी युती होऊ नये यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. तर जुन्या कार्यकर्त्यांनी मतदारांची द्विधा अवस्था होणार असल्याने युती झालेली बरी असा आग्रह धरला आहे.युती झाल्यास ९५ प्लस कल्याणमध्ये सेना-भाजपात तगडी स्पर्धा- युती झाल्यास भाजपाच्या पारड्यात ३५-४५ जागा मिळतील तर सेनेच्या पारड्यात ५०-५५ जागा मिळतील असा त्या पक्षांच्या नेत्यांना विश्वास आहे. युती न झाल्यास शिवसेनेला डोंबिवलीतून फटका बसू शकतो, तर कल्याणमधून शिवसेना-भाजपामध्ये तगडी फाईट होऊ शकते. ग्रामीणचे चित्र अद्यापही स्पष्ट नाही.- भाजपाच्या दृष्टीने डोंबिवली पश्चिम ७, पूर्व १२-१५, कल्याण पूर्व-६-८, पश्चिम(मोहना-टिटवाळापर्यंत) २०हून अधिक तसेच ग्रामीणमधूनही चांगले यश मिळेल असे सांगण्यात येत आहे. शिवसेना मात्र असा कोणताही अंदाज वर्तवत नसून डोंबिवलीत बसणारा फटका कसा कमी करता येईल आणि ग्रामीणमधून संघर्ष समितीचा रोष कमी करून कसे जास्तीतजास्त यश मिळवता येईल, यावर लक्ष केंद्रित करत आहे.- यावरून भाजपा ९पेक्षा जास्त यश मिळवू शकते, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे सेनेच्या गोटात तणाव असून, नेमके काय करावे हा पेच आहे. दोन्ही पक्षांना बंडाळी थांबवतांना प्रचंड मनस्ताप होणार आहे. एकेका वॉर्डातून नको तेवढे इच्छुक असून, सर्वांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे ज्याला त्याला उमेदवारीची अपेक्षा आहे. ती पूर्ण न झाल्यास संबंधित पक्षांना त्याचा त्रास होणार असून, कदाचित त्याचा फायदाच काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसेला होऊ शकतो. अथवा अपक्षांचीही वर्णी लागू शकते, असेही अभ्यासक सांगतात.