शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारलं, RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
4
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
5
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
6
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
7
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
8
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
9
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
10
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
11
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
12
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
13
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
14
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
15
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
16
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
17
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
18
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
19
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
20
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल तर रश्मी ठाकरेही सज्ज", सत्तारांच्या विधानानं चर्चेला उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 21:19 IST

सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई देखील सज्ज आहेत आणि त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे, असं विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

औरंगाबाद-

सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई देखील सज्ज आहेत आणि त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे, असं विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सत्तारांनी रश्मी ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेण्याची ही पहिली वेळ नाही. हिवाळी अधिवेशावेळीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिच्या दुखण्याच्या त्रासामुळे ते मंत्रालयात उपस्थित राहू शकत नसतानाही सत्तार यांनी यासंदर्भातील विधान केलं होतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं अब्दुल सत्तार म्हणाले होते. 

"शिवसेनेचा मुख्यमंत्री बनण्यासाठी २५ वर्षांपासून राज्यात पूजा झाली आहे. २५ वर्ष मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहावेत अशी विनंतीही सर्वांनी केली आहे. सुप्रियाताई मुख्यमंत्री झाल्यास कधी होतील, कोणत्या परिस्थितीत होतील हे आज मी काही बोलणार नाही. त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई सज्ज आहेत. त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे. सुप्रियाताईंचा मुख्यमंत्रीपदासाठीचा नंबर २५ वर्षांनंतर लागावा ही ईश्वर, अल्लाहकडे प्रार्थना", असं अब्दुल सत्तार म्हणाले. 

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार का असे विचारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी "हे महाराष्ट्राची जनता ठरवेल; मी कसं ठरवणार?", अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे काल उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील जनतेसोबत चर्चा केली. त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे देखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतचं वक्तव्य केलं. 

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राज्यात चांगला पाऊस पडू दे. बळीराजाचं राज्य येऊ दे असं साकडं तुळजाभवानीकडे घातल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv Senaशिवसेना