शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल, तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा - संजय राऊत

By admin | Updated: October 13, 2015 18:49 IST

आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल तर त्यांनीच राजीनामा द्यावा असे सांगत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी युती ठेवायची का तोडायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ढकलला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - राजीनाम्याची मागणी आमच्याकडे का करता, जर आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल तर त्यांनीच राजीनामा द्यावा असे सांगत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी युती ठेवायची का तोडायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ढकलला. आम्ही जे काही केलं ते राष्ट्रभक्तीसाठी केलं, ज्या पाकड्यांनी तुकाराम ओंबळेंसारख्या मुंबई पोलीसांचे बळी घेतले त्याच मुंबई पोलीसांना काल पाकड्यांची सुरक्षा करावी लागली ही पोलीसांसाठी मानहानी असल्याचे राऊत म्हणाले.
जर भूमिका पटत नसेल तर शिवसेनेचे आमदार राजीनामा का देत नाहीत, या प्रश्नावर हा प्रश्न आम्हालाच का विचारला जातो, भाजपाला का विचारत नाही असा सवाल राऊतांनी विचारला.
जर, आम्ही करतो ते तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या, हे दोघांचं संयुक्त सरकार आहे असं सांगत संजय राऊत यांनी सगळ्या प्रश्नांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवला आहे.
 
सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासणं, अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत होणं या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- शिवसेना पाकिस्तानविरोधात एकाकी लढा देत आहे, हा गुन्हा आहे का?
- पाकड्यांच्या रक्षणासाठी पोलिसांचे संरक्षण देणं हा शहीदांचा अपमान आहे.
- ज्या पोलिसांनी पाकड्यांविरोधात लढा दिला, तेच पोलिस काल कसुरींच्या संरक्षणासाठी माना खाली घालून उभे होते, ही शरमेची आणि चिंताजनक बाब आहे.
शिवसेनेमुळे महाराष्ट्राची काय बदनामी झाली  असा सवाल संजय राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.
06:37PM - पाकिस्तानविरोधात लढणा-यांचा, शिवसैनिकांचा सत्कार करणं योग्यंच.
- दरवेळेस आमच्या नेत्यांच्या राजीनाम्याविषयी प्रश्न का उपस्थित केला जातो? आमचा प्रखर राष्ट्रवादी बाणा कोणाला टोचत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
- पाकिस्तानविरोधात लढणारी प्रत्येक व्यक्ती ही जवानासमान असून शिवसैनिकही देशाचे जवानच आहेत.
- आम्ही काल जे केलं ते योग्यचं होता, कालच्या प्रसंगात सरकारने आमच्यासोबत असायला हवं होतं.