शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल, तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा - संजय राऊत

By admin | Updated: October 13, 2015 18:49 IST

आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल तर त्यांनीच राजीनामा द्यावा असे सांगत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी युती ठेवायची का तोडायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ढकलला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - राजीनाम्याची मागणी आमच्याकडे का करता, जर आमची राष्ट्रभक्ती खुपत असेल तर त्यांनीच राजीनामा द्यावा असे सांगत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी युती ठेवायची का तोडायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ढकलला. आम्ही जे काही केलं ते राष्ट्रभक्तीसाठी केलं, ज्या पाकड्यांनी तुकाराम ओंबळेंसारख्या मुंबई पोलीसांचे बळी घेतले त्याच मुंबई पोलीसांना काल पाकड्यांची सुरक्षा करावी लागली ही पोलीसांसाठी मानहानी असल्याचे राऊत म्हणाले.
जर भूमिका पटत नसेल तर शिवसेनेचे आमदार राजीनामा का देत नाहीत, या प्रश्नावर हा प्रश्न आम्हालाच का विचारला जातो, भाजपाला का विचारत नाही असा सवाल राऊतांनी विचारला.
जर, आम्ही करतो ते तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या, हे दोघांचं संयुक्त सरकार आहे असं सांगत संजय राऊत यांनी सगळ्या प्रश्नांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळवला आहे.
 
सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासणं, अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत होणं या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- शिवसेना पाकिस्तानविरोधात एकाकी लढा देत आहे, हा गुन्हा आहे का?
- पाकड्यांच्या रक्षणासाठी पोलिसांचे संरक्षण देणं हा शहीदांचा अपमान आहे.
- ज्या पोलिसांनी पाकड्यांविरोधात लढा दिला, तेच पोलिस काल कसुरींच्या संरक्षणासाठी माना खाली घालून उभे होते, ही शरमेची आणि चिंताजनक बाब आहे.
शिवसेनेमुळे महाराष्ट्राची काय बदनामी झाली  असा सवाल संजय राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.
06:37PM - पाकिस्तानविरोधात लढणा-यांचा, शिवसैनिकांचा सत्कार करणं योग्यंच.
- दरवेळेस आमच्या नेत्यांच्या राजीनाम्याविषयी प्रश्न का उपस्थित केला जातो? आमचा प्रखर राष्ट्रवादी बाणा कोणाला टोचत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
- पाकिस्तानविरोधात लढणारी प्रत्येक व्यक्ती ही जवानासमान असून शिवसैनिकही देशाचे जवानच आहेत.
- आम्ही काल जे केलं ते योग्यचं होता, कालच्या प्रसंगात सरकारने आमच्यासोबत असायला हवं होतं.