शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

‘अच्छे दिन’ न आल्यास अराजक

By admin | Updated: July 24, 2015 02:25 IST

आता मोदीच देशाला वाचवतील, लोकांचं कल्याण करतील, अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळेच या आशेच्या जर चिंधड्या उडाल्या तर काय

मुंबई : आता मोदीच देशाला वाचवतील, लोकांचं कल्याण करतील, अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळेच या आशेच्या जर चिंधड्या उडाल्या तर काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही. बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचे तर फक्त अराजक आणि अराजकच माजेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलखतीत दिला आहे.युती मजबूत करण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न व्हायला पाहिजेत. शिवसेना ही सत्तेकरिता कधी युती करत नाही. निवडणुका असोत किंवा नसोत, चांगले दिवस असोत की नसोत एकदा मित्र म्हटले म्हणजे मित्र ही शिवसेनेची नीती आहे. शिवसेनाप्रमुखांनी ती आपल्याला शिकवली आहे, अशा शब्दांत भाजपाच्या स्वबळाच्या नाऱ्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष इकडे येतात व युतीचे राजकारण पुरे करा असे सांगतात. पण तिथे काश्मीरमध्ये मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहुना पाकधार्जिण्या पक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठे आश्चर्य असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. गोंदियातील काँग्रेस व भाजपा युतीवरही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ठाकरे कधीच निराश होत नाहीत. केंद्रात व राज्यात अशा दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेत सहभागी आहे. पण ही सरकारे शिवसेनेची नाहीत. पूर्वी एनडीएतील घटक पक्षांना विश्वासात घेऊन अटलजी सरकार चालवत होते. चंद्राबाबू, रामविलास पासवान असे नेते एनडीएत आले व गेले. ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशा प्रकारे जर सरकार चालवणार असाल तर तशा राजकारणात शिवसेना पडणार नाही, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)