शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

‘अच्छे दिन’ न आल्यास अराजक

By admin | Updated: July 24, 2015 02:25 IST

आता मोदीच देशाला वाचवतील, लोकांचं कल्याण करतील, अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळेच या आशेच्या जर चिंधड्या उडाल्या तर काय

मुंबई : आता मोदीच देशाला वाचवतील, लोकांचं कल्याण करतील, अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळेच या आशेच्या जर चिंधड्या उडाल्या तर काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही. बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचे तर फक्त अराजक आणि अराजकच माजेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलखतीत दिला आहे.युती मजबूत करण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न व्हायला पाहिजेत. शिवसेना ही सत्तेकरिता कधी युती करत नाही. निवडणुका असोत किंवा नसोत, चांगले दिवस असोत की नसोत एकदा मित्र म्हटले म्हणजे मित्र ही शिवसेनेची नीती आहे. शिवसेनाप्रमुखांनी ती आपल्याला शिकवली आहे, अशा शब्दांत भाजपाच्या स्वबळाच्या नाऱ्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष इकडे येतात व युतीचे राजकारण पुरे करा असे सांगतात. पण तिथे काश्मीरमध्ये मात्र आझाद काश्मीरवाल्या किंबहुना पाकधार्जिण्या पक्षासोबत युती त्यांना चालते हे एक मोठे आश्चर्य असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. गोंदियातील काँग्रेस व भाजपा युतीवरही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ठाकरे कधीच निराश होत नाहीत. केंद्रात व राज्यात अशा दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेत सहभागी आहे. पण ही सरकारे शिवसेनेची नाहीत. पूर्वी एनडीएतील घटक पक्षांना विश्वासात घेऊन अटलजी सरकार चालवत होते. चंद्राबाबू, रामविलास पासवान असे नेते एनडीएत आले व गेले. ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशा प्रकारे जर सरकार चालवणार असाल तर तशा राजकारणात शिवसेना पडणार नाही, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)