शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी दिल्यास किमान २४ हजार कोटींचा बोजा

By admin | Updated: March 10, 2017 01:03 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला तर सरकारच्या तिजोरीवर तब्बल २४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असून आधीच आर्थिक संकटात असलेल्या सरकारचे

- यदु जोशी, मुंबई

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला तर सरकारच्या तिजोरीवर तब्बल २४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असून आधीच आर्थिक संकटात असलेल्या सरकारचे त्यामुळे कंबरडे मोडणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कर्जमाफीची मागणी एकीकडे केलेली असताना दुसरीकडे ती स्वत:च्या भरवश्यावर देण्याची राज्य सरकारची ‘आर्थिक औकात’ं नाही, अशी अवस्था आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडे मदतीसाठी हात पसरणे वा आणखी कर्ज घेणे असे दोनच पर्याय राज्य सरकारपुढे असतील. अल्पमुदती, मध्यम आणि दीर्घमुदती असे तीन प्रकारचे कर्ज शेतकरी बँकांकडून घेत असतात. त्यातील अल्पमुदती कर्ज हे पीककर्ज असते तर अन्य दोन प्रकारचे कर्ज हे शेतीसाठीच्या उपकरणांची खरेदी, विहीर तयार करणे आदींसाठी असतात. लहान शेतकरी मुख्यत्वे अल्प मुदती कर्ज घेतो. कर्जमाफीचा फायदा लहान आणि गरीब शेतकऱ्यांना तसेच आत्महत्याग्रस्त विदर्भ, मराठवाड्याला अधिक व्हायचा असेल तर कर्जमाफी ही शेतजमिनीच्या निकषावर (उदा.हेक्टरी ५० हजार) न देता ती सरसकट विशिष्ट रकमेची करावी, असा विचारही या निमित्ताने समोर आला आहे. तसे झाल्यास २४ हजार कोटींचा बोजा बराच कमी करता येईल.सूत्रांनी सांगितले की प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट ५० हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफी द्यावी काय, ती दिल्यास किती कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडेल, याची चाचपणी सरकारकडून सध्या केली जात असल्याची माहिती आहे. पुनर्गठनामुळे अडचणआधी डोक्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळावे यासाठी सध्याच्या सरकारने कर्जाचे पुनर्गठन केले. ताज्या कर्जावर ४ टक्के व्याजदर असतो पण पुनर्गठन केलेल्या कर्जावर बँकांनी १२ टक्क्यांपर्यंत व्याज आकारणे सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पुनर्गठीत कर्जावरही ४ टक्केच व्याज आकारले तर तो एक मोठा दिलासा ठरेल. २००८ मध्ये तत्कालिन केंद्र सरकारने देशाच्या काही राज्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ६ हजार ९१० कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले होते. २००९ मध्ये राज्य शासनाने ४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. कोणते कर्ज माफ होईल?कर्जमाफी देताना मुख्यत्वे पीक कर्ज माफ करण्याची पद्धत आहे. ते अल्पमुदती असते आणि त्याची थकबाकी साधारणत: २४ हजार कोटी रुपयांची आहे. त्यातील ९ हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आणि उर्वरित राष्ट्रीयकृत बँकांची आहे.अर्थात, जिल्हा बँकांची आकडेवारी हाती आलेली असली तरी राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जाची वस्तुनिष्ठ आकडेवारी अद्याप यावयाची आहे. सहकार विभागाने ती राज्यस्तरीय बँकर्स समितीकडून मागविली आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा आकडा १५ हजार कोटींच्या घरात असावा असा अंदाज आहे. ही कर्जमाफी दिली तर राज्य सरकारला या दोन्ही बँकांना २४ हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. चालू कर्ज ३७ हजार कोटींचे२०१६-१७ च्या खरिप हंगामासाठी ४८ लाख शेतकऱ्यांनी ३३ हजार १९५ कोटी रुपयांचे तर रब्बी हंगामासाठी ४.३७ लाख शेतकऱ्यांनी ३ हजार ७७१ कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे.कर्जमाफी देताना चालू कर्ज माफ केले जात नाही पण उद्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा म्हटलं तर हे ३७ हजार कोटी आणि थकबाकीचे २२ हजार कोटी असे एकूण ५९ हजार कोटी रुपये माफ करावे लागतील. चालू कर्ज माफ करणे हे कर्जमाफीमध्ये अपेक्षित नाही. थकबाकीच माफ करण्याची पद्धत आहे, असे सहकार विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.