शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

कर्जमाफी दिल्यास किमान २४ हजार कोटींचा बोजा

By admin | Updated: March 10, 2017 01:03 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला तर सरकारच्या तिजोरीवर तब्बल २४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असून आधीच आर्थिक संकटात असलेल्या सरकारचे

- यदु जोशी, मुंबई

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला तर सरकारच्या तिजोरीवर तब्बल २४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असून आधीच आर्थिक संकटात असलेल्या सरकारचे त्यामुळे कंबरडे मोडणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कर्जमाफीची मागणी एकीकडे केलेली असताना दुसरीकडे ती स्वत:च्या भरवश्यावर देण्याची राज्य सरकारची ‘आर्थिक औकात’ं नाही, अशी अवस्था आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडे मदतीसाठी हात पसरणे वा आणखी कर्ज घेणे असे दोनच पर्याय राज्य सरकारपुढे असतील. अल्पमुदती, मध्यम आणि दीर्घमुदती असे तीन प्रकारचे कर्ज शेतकरी बँकांकडून घेत असतात. त्यातील अल्पमुदती कर्ज हे पीककर्ज असते तर अन्य दोन प्रकारचे कर्ज हे शेतीसाठीच्या उपकरणांची खरेदी, विहीर तयार करणे आदींसाठी असतात. लहान शेतकरी मुख्यत्वे अल्प मुदती कर्ज घेतो. कर्जमाफीचा फायदा लहान आणि गरीब शेतकऱ्यांना तसेच आत्महत्याग्रस्त विदर्भ, मराठवाड्याला अधिक व्हायचा असेल तर कर्जमाफी ही शेतजमिनीच्या निकषावर (उदा.हेक्टरी ५० हजार) न देता ती सरसकट विशिष्ट रकमेची करावी, असा विचारही या निमित्ताने समोर आला आहे. तसे झाल्यास २४ हजार कोटींचा बोजा बराच कमी करता येईल.सूत्रांनी सांगितले की प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट ५० हजार रुपयांपर्यंतची कर्जमाफी द्यावी काय, ती दिल्यास किती कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडेल, याची चाचपणी सरकारकडून सध्या केली जात असल्याची माहिती आहे. पुनर्गठनामुळे अडचणआधी डोक्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळावे यासाठी सध्याच्या सरकारने कर्जाचे पुनर्गठन केले. ताज्या कर्जावर ४ टक्के व्याजदर असतो पण पुनर्गठन केलेल्या कर्जावर बँकांनी १२ टक्क्यांपर्यंत व्याज आकारणे सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पुनर्गठीत कर्जावरही ४ टक्केच व्याज आकारले तर तो एक मोठा दिलासा ठरेल. २००८ मध्ये तत्कालिन केंद्र सरकारने देशाच्या काही राज्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ६ हजार ९१० कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले होते. २००९ मध्ये राज्य शासनाने ४ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. कोणते कर्ज माफ होईल?कर्जमाफी देताना मुख्यत्वे पीक कर्ज माफ करण्याची पद्धत आहे. ते अल्पमुदती असते आणि त्याची थकबाकी साधारणत: २४ हजार कोटी रुपयांची आहे. त्यातील ९ हजार २०० कोटी रुपयांची थकबाकी ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आणि उर्वरित राष्ट्रीयकृत बँकांची आहे.अर्थात, जिल्हा बँकांची आकडेवारी हाती आलेली असली तरी राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जाची वस्तुनिष्ठ आकडेवारी अद्याप यावयाची आहे. सहकार विभागाने ती राज्यस्तरीय बँकर्स समितीकडून मागविली आहे. राष्ट्रीयकृत बँकांचा आकडा १५ हजार कोटींच्या घरात असावा असा अंदाज आहे. ही कर्जमाफी दिली तर राज्य सरकारला या दोन्ही बँकांना २४ हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. चालू कर्ज ३७ हजार कोटींचे२०१६-१७ च्या खरिप हंगामासाठी ४८ लाख शेतकऱ्यांनी ३३ हजार १९५ कोटी रुपयांचे तर रब्बी हंगामासाठी ४.३७ लाख शेतकऱ्यांनी ३ हजार ७७१ कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे.कर्जमाफी देताना चालू कर्ज माफ केले जात नाही पण उद्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा म्हटलं तर हे ३७ हजार कोटी आणि थकबाकीचे २२ हजार कोटी असे एकूण ५९ हजार कोटी रुपये माफ करावे लागतील. चालू कर्ज माफ करणे हे कर्जमाफीमध्ये अपेक्षित नाही. थकबाकीच माफ करण्याची पद्धत आहे, असे सहकार विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.