शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

गृहनिर्माण योजना निश्चित कालावधीत पूर्ण न केल्यास एसआरए विकासक बदलणार - प्रकाश महेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 02:21 IST

गृहनिर्माण योजना निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात आली नाही तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे विकासक बदलण्याची कारवाई केली जाईल, असे आदेश गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी दिले.

मुंबई : गृहनिर्माण योजना निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात आली नाही तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे विकासक बदलण्याची कारवाई केली जाईल, असे आदेश गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी दिले.वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्यालयात गृहनिर्माणमंत्र्यांनी घाटकोपर येथे राबविण्यात येत असलेल्या जवळपास ३० योजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते. रखडलेल्या झोपु योजनांबरोबरच घाटकोपर येथील झोपड्यांचा बायोमेट्रिक सर्व्हे आणि केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांच्या म्हणजेच रेल्वे आणि संरक्षण खात्याच्या जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांबाबत बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले. घाटकोपर येथील शांती नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, अष्टविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच इतर संस्थांच्या रखडलेल्या योजनांबाबत महेता यांनी संबंधितांच्या शंकांचे निरसन केले. तसेच झोपडीधारकांना पक्की घरे लवकर मिळावी यासाठी मंत्र्यांनी अधिकारी वर्गाला योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.