शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

गोमांस जवळ असते तर एकही दहशतवादी वाचला नसता - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 11, 2017 21:57 IST

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. यात्रेकरूंवर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 -  अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून  उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांजवळ गोमांस असते तर त्या दहशतवाद्यांपैकी एकही दहशतवादी वाचला नसता. एरवी दिसणारे गौरक्षक आता कुठे गेलेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अमरनाथ हल्ल्यावरून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. "अमरनाथ यात्रेवर झालेला दहशतवादी हल्ला ही भयंकर घटना आहे. हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होणे हे केवळ भारतातच शक्य आहे." असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या तथाकथित गौरक्षकांवरही टीकास्त्र सोडले. जर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांजवळ गोमांस आढळले असते तर त्यांच्यापैकी एकही दहशतवादी वाचला नसता. आता हे गौरक्षक कुठे गेलेत, असा सवाल त्यांनी केला.  
सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेकरूंच्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांमध्ये महाराष्ट्रातील दोन भाविकांचा समावेश होता. अधिक वाचा  ( काश्मीरमध्ये हिंदूच सुरक्षित नाहीत: मा.गो.वैद्य)(अमरनाथ यात्रेचे हल्लेखोर काश्मीरीही नाहीत आणि मुसलमानही नाही: फारूक अब्दुल्ला)( अमरनाथ हल्ल्यावरून विरोधकांचे पंतप्रधानांवर टीकास्र )
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.