शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

गोमांस जवळ असते तर एकही दहशतवादी वाचला नसता - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 11, 2017 21:57 IST

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. यात्रेकरूंवर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 -  अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून  उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांजवळ गोमांस असते तर त्या दहशतवाद्यांपैकी एकही दहशतवादी वाचला नसता. एरवी दिसणारे गौरक्षक आता कुठे गेलेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अमरनाथ हल्ल्यावरून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. "अमरनाथ यात्रेवर झालेला दहशतवादी हल्ला ही भयंकर घटना आहे. हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होणे हे केवळ भारतातच शक्य आहे." असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या तथाकथित गौरक्षकांवरही टीकास्त्र सोडले. जर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांजवळ गोमांस आढळले असते तर त्यांच्यापैकी एकही दहशतवादी वाचला नसता. आता हे गौरक्षक कुठे गेलेत, असा सवाल त्यांनी केला.  
सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेकरूंच्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांमध्ये महाराष्ट्रातील दोन भाविकांचा समावेश होता. अधिक वाचा  ( काश्मीरमध्ये हिंदूच सुरक्षित नाहीत: मा.गो.वैद्य)(अमरनाथ यात्रेचे हल्लेखोर काश्मीरीही नाहीत आणि मुसलमानही नाही: फारूक अब्दुल्ला)( अमरनाथ हल्ल्यावरून विरोधकांचे पंतप्रधानांवर टीकास्र )
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.