शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

गोमांस जवळ असते तर एकही दहशतवादी वाचला नसता - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 11, 2017 21:57 IST

अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. यात्रेकरूंवर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 -  अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून  उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांजवळ गोमांस असते तर त्या दहशतवाद्यांपैकी एकही दहशतवादी वाचला नसता. एरवी दिसणारे गौरक्षक आता कुठे गेलेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी अमरनाथ हल्ल्यावरून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. "अमरनाथ यात्रेवर झालेला दहशतवादी हल्ला ही भयंकर घटना आहे. हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होणे हे केवळ भारतातच शक्य आहे." असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करणाऱ्या तथाकथित गौरक्षकांवरही टीकास्त्र सोडले. जर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांजवळ गोमांस आढळले असते तर त्यांच्यापैकी एकही दहशतवादी वाचला नसता. आता हे गौरक्षक कुठे गेलेत, असा सवाल त्यांनी केला.  
सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेकरूंच्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांमध्ये महाराष्ट्रातील दोन भाविकांचा समावेश होता. अधिक वाचा  ( काश्मीरमध्ये हिंदूच सुरक्षित नाहीत: मा.गो.वैद्य)(अमरनाथ यात्रेचे हल्लेखोर काश्मीरीही नाहीत आणि मुसलमानही नाही: फारूक अब्दुल्ला)( अमरनाथ हल्ल्यावरून विरोधकांचे पंतप्रधानांवर टीकास्र )
मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री ८ वाजून २0 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.