शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मद्यपींनी महिलांची छेडछाड केल्यास दहा वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: April 25, 2017 02:13 IST

दारू पिऊन महिलांची छेडछाड करणाऱ्या गुन्हेगाराला सात ते दहा वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद नवीन दारूबंदी कायद्यामध्ये केली आहे

पारनेर (जि. अहमदनगर) : दारू पिऊन महिलांची छेडछाड करणाऱ्या गुन्हेगाराला सात ते दहा वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद नवीन दारूबंदी कायद्यामध्ये केली आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.अण्णा हजारे व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात गत आठवड्यात राळेगणसिद्धी येथे चर्चा झाल्यानंतर कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात आतापर्यंत शिक्षेविषयी संभ्रम होता. तो आता दूर झाला आहे, असे हजारे म्हणाले.एखाद्या हॉटेलमध्ये विना परवान्याची दारू विकली जाते. या संबंधाने ग्रामरक्षक दलाने पोलीस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याला कळविल्यानंतर त्यांनी त्या हॉटेल मालकांवर कारवाई करायची आहे. हॉटेल मालकावर दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या हॉटेलचा परवाना तत्काळ रद्द करावयाचा आहे.ज्या गावातील २५ टक्के महिला ग्रामसभा घेऊन ठराव करीत असतील, की आमच्या गावात ग्रामरक्षक दल करण्यात यावे किंवा ग्रामपंचायतीने बोलविलेल्या ग्रामसभेमध्ये ५० टक्के लोकांनी ठरविले की आमच्या गावात ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात यावे. तर तसा अर्ज उप विभागीय दंडाधिकारी यांच्याकडे जाईल. उप विभागीय दंडाधिकारी तहसीलदारांना कळवतील व त्यानंतर तहसीलदार ग्रामरक्षक दल निवडीसाठी दिनांक, वार व वेळ निश्चित करून विशेष ग्रामसभा बोलावतील. सदर ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल. तो ग्रामसभेचा पुरावा असेल. ग्रामसभा ग्रामरक्षक दलामध्ये कोण सदस्य असावेत, त्यांची नावे सुचवतील. दलामध्ये ३३ टक्के महिला असतील, असे हजारे म्हणाले. (प्रतिनिधी)