शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘तत्काळ’साठी ओळखपत्राची अट शिथिल

By admin | Updated: July 20, 2015 23:03 IST

१ सप्टेंबरपासून अंमलबजावणी ; रेल्वे प्रवाशांना दिलासा.

अकोला : रेल्वे प्रवासासाठी तत्काळ आरक्षण करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य होते; पण रेल्वे मंत्रालयाने ही अट शिथिल केली असून, यापुढे प्रवाशांना तत्काळ तिकीट काढण्यासाठी ओळखपत्राची गरज भासणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून होणार असून, यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांना तत्काळ तिकीट काढण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य होते. त्यासाठी प्रवाशांना ओळखपत्राच्या झेरॉक्सप्रती आणि ओळखपत्रावरील क्रमांक अर्जावर अंकित करावा लागत होता. इंटरनेटद्वारे तत्काळ तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना आपल्या ओळखपत्राची प्रत, तसेच त्यावरील क्रमांक नोंदवावा लागत होता. तत्काळकरिता या अटी येत्या १ सप्टेंबरपासून शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित सुधारणेनुसार तत्काळ तिकीट काढणार्‍या प्रवाशांना प्रवासादरम्यान ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तिकीट कलेक्टरच्या पडताळणीदरम्यान ते सादर न करू शकल्यास ह्यत्याह्ण तिकिटावर प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांकडून संपूर्ण प्रवास भाडे आकारले जाईल. त्यामुळे तत्काळ योजनेचा लाभ घेणार्‍यांना यापुढे प्रवासादरम्यान निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, मोटार वाहनचालक परवाना, केंद्र किंवा राज्य शासनाचे ओळख प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, लॅमिनेटेड फोटोसहित बँकांद्वारा दिले जाणारे क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, राज्य किंवा केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत, जिल्हा किंवा स्थानिक प्रशासनाद्वारा वितरित ओळखपत्रांपैकी एकाची मूळप्रत सोबत अनिवार्य राहणार आहे.

*एजंटांना पुन्हा सुगीचे दिवस?

         तत्काळकरिता ओळखपत्राची अट शिथिल केल्यामुळे पूर्वीप्रमाणेच एजंटांना सुगीचे दिवस येण्याची भिती भुसावळ मंडळ अधिकार्‍यांनी व्यक्त केली. जीआरपी व आरपीएफ पोलिसांना आरक्षण खिडक्यांवर अधिक सतर्क राहावे लागणार आहे. इंटरनेटवर ऑनलाईनच्या माध्यमातून तत्काळ तिकिटांचा काळाबाजार होण्याची अधिक शक्यता असल्याची बाब अधिकार्‍यांनी स्पष्ट केली.