शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श इमारत पाडा!

By admin | Updated: April 30, 2016 04:25 IST

‘आदर्श’ सोसायटी पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शुक्रवारी दिला.

मुंबई : राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात ज्या एका इमारतीमुळे वादळ उठले, राज्याच्या एका मुख्यमंत्र्याला पदावरून पायउतार व्हावे लागले आणि अनेक मंत्री, सनदी अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकले, ती ‘आदर्श’ सोसायटी पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शुक्रवारी दिला. याशिवाय या घोटाळ्यात सहभागी असलेले राजकीय नेते, मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांवर सत्तेचा व पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी फौजदारी व दिवाणी कारवाई करण्याचा विचार करा, अशी सूचनाही राज्य सरकारला केली. या आदेशामुळे सरकार, मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, स्वत:च्याच आदेशाला न्यायालयाने १२ आठवड्यांची स्थगिती दिली आहे.दक्षिण मुंबईमध्ये कुलाबा येथील ३१ मजली आदर्श सोसायटी अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल २०१०पासून वादाच्या भोवऱ्यात अडकली. याविरुद्ध अनेक याचिका आणि जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. अखेरीस शुक्रवारी न्या. रणजीत मोरे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने ही वादग्रस्त इमारत पाडण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला. येत्या चार आठवड्यांत इमारत पाडा, असा आदेश दिल्यावर आदर्श इमारतीच्या वकिलांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी १२ आठवड्यांची स्थगिती द्यावी, अशी केलेली विनंती खंडपीठाने मान्य केली. बेकायदेशीर ‘आदर्श’सुरुवातीला सहा मजली बांधण्याची परवानगी असलेली आदर्श सोसायटी राजकीय नेते, तत्कालीन मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांच्या मर्जीने १०० मीटरपर्यंत वाढवण्यात आली. या सोसायटीमध्ये नेते व सनदी अधिकाऱ्यांनी स्वत:ची मुले व नातेवाइकांसाठी अगदी क्षुल्लक दरात फ्लॅट घेतले. कोस्टल रेग्युलेशन झोन, पर्यावरण कायदा व अन्य कायद्यांना धाब्यावर बसवून ही इमारत उभारण्यात आली. या सोसायटीमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. तर सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांचीही नावे घोटाळ्यात गोवण्यात आली. तसेच मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त जयराज फाटक, आयएसए अधिकारी उत्तम खोब्रागडे, विधान परिषदेचे माजी सदस्य कन्हैयालाल गिडवाणी अशी अनेक नावे या घोटाळ्यात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्यासह अन्य जणांवर सीबीआयने आरोपपत्र ठेवले आहे. केसमधील विलासराव देशमुख, गिडवाणी यांचे निधन झालेले आहे. (प्रतिनिधी)>मंत्री, अधिकाऱ्यांवर कारवाई कराया घोटाळ्यात सहभागी असलेले राजकीय नेते, मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई केली नसेल तर सत्तेचा आणि पदाचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध फौजदारी व दिवाणी कारवाई करण्याचा विचार करा, अशी कठोर सूचनाही खंडपीठाने सरकारला केली. त्याशिवाय खंडपीठाने सनदी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि त्यानंतर शिस्तपालन प्राधिकरणाने कायद्यानुसार निर्णय घ्यावा, अशीही सूचना खंडपीठाने राज्य सरकारला केली. तर संरक्षण मंत्रालयानेही अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, असे खंडपीठाने म्हटले. हा घोटाळा निदर्शनास येऊनही त्वरित कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करा, अशी सूचना खंडपीठाने संरक्षण मंत्रालयाला केली.>भूखंड ताब्यात घ्या : ‘आदर्श’चा भूखंड येत्या चार आठवड्यांत ताब्यात घ्या, असाही आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिला.नियमांचे उल्लंघन करून उच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या आदर्श सोसायटीला सहा लाखांचा दंड ठोठावला. या दंडाची रक्कम केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाचे संचालक भरत भूषण, सल्लागार नलिनी भट, डॉ. सेंटिल वेल, तिरुनवकारसा, टी. सी. बेंझामिन आणि महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांना देण्यात यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले.>काय आहे केस?पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०११मध्ये केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने आदर्श सोसायटी पाडण्याचा आदेश सरकारला दिला. या आदेशाविरुद्ध सोसायटीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसरी याचिकाही आदर्श सोसायटीनेच केली होती. महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) रद्द करत पाणी व वीजपुरवठा बंद केल्याबद्दल सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली. तर तिसरी याचिका खुद्द संरक्षण मंत्रालयाने केली. त्या उच्च न्यायालयाने निकाली काढल्या.