शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

आदर्श इमारत पाडा!

By admin | Updated: April 30, 2016 04:25 IST

‘आदर्श’ सोसायटी पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शुक्रवारी दिला.

मुंबई : राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात ज्या एका इमारतीमुळे वादळ उठले, राज्याच्या एका मुख्यमंत्र्याला पदावरून पायउतार व्हावे लागले आणि अनेक मंत्री, सनदी अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकले, ती ‘आदर्श’ सोसायटी पाडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शुक्रवारी दिला. याशिवाय या घोटाळ्यात सहभागी असलेले राजकीय नेते, मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांवर सत्तेचा व पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी फौजदारी व दिवाणी कारवाई करण्याचा विचार करा, अशी सूचनाही राज्य सरकारला केली. या आदेशामुळे सरकार, मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, स्वत:च्याच आदेशाला न्यायालयाने १२ आठवड्यांची स्थगिती दिली आहे.दक्षिण मुंबईमध्ये कुलाबा येथील ३१ मजली आदर्श सोसायटी अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल २०१०पासून वादाच्या भोवऱ्यात अडकली. याविरुद्ध अनेक याचिका आणि जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. अखेरीस शुक्रवारी न्या. रणजीत मोरे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने ही वादग्रस्त इमारत पाडण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला. येत्या चार आठवड्यांत इमारत पाडा, असा आदेश दिल्यावर आदर्श इमारतीच्या वकिलांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी १२ आठवड्यांची स्थगिती द्यावी, अशी केलेली विनंती खंडपीठाने मान्य केली. बेकायदेशीर ‘आदर्श’सुरुवातीला सहा मजली बांधण्याची परवानगी असलेली आदर्श सोसायटी राजकीय नेते, तत्कालीन मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांच्या मर्जीने १०० मीटरपर्यंत वाढवण्यात आली. या सोसायटीमध्ये नेते व सनदी अधिकाऱ्यांनी स्वत:ची मुले व नातेवाइकांसाठी अगदी क्षुल्लक दरात फ्लॅट घेतले. कोस्टल रेग्युलेशन झोन, पर्यावरण कायदा व अन्य कायद्यांना धाब्यावर बसवून ही इमारत उभारण्यात आली. या सोसायटीमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. तर सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांचीही नावे घोटाळ्यात गोवण्यात आली. तसेच मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त जयराज फाटक, आयएसए अधिकारी उत्तम खोब्रागडे, विधान परिषदेचे माजी सदस्य कन्हैयालाल गिडवाणी अशी अनेक नावे या घोटाळ्यात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अशोक चव्हाण यांच्यासह अन्य जणांवर सीबीआयने आरोपपत्र ठेवले आहे. केसमधील विलासराव देशमुख, गिडवाणी यांचे निधन झालेले आहे. (प्रतिनिधी)>मंत्री, अधिकाऱ्यांवर कारवाई कराया घोटाळ्यात सहभागी असलेले राजकीय नेते, मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई केली नसेल तर सत्तेचा आणि पदाचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध फौजदारी व दिवाणी कारवाई करण्याचा विचार करा, अशी कठोर सूचनाही खंडपीठाने सरकारला केली. त्याशिवाय खंडपीठाने सनदी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि त्यानंतर शिस्तपालन प्राधिकरणाने कायद्यानुसार निर्णय घ्यावा, अशीही सूचना खंडपीठाने राज्य सरकारला केली. तर संरक्षण मंत्रालयानेही अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, असे खंडपीठाने म्हटले. हा घोटाळा निदर्शनास येऊनही त्वरित कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करा, अशी सूचना खंडपीठाने संरक्षण मंत्रालयाला केली.>भूखंड ताब्यात घ्या : ‘आदर्श’चा भूखंड येत्या चार आठवड्यांत ताब्यात घ्या, असाही आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिला.नियमांचे उल्लंघन करून उच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या आदर्श सोसायटीला सहा लाखांचा दंड ठोठावला. या दंडाची रक्कम केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाचे संचालक भरत भूषण, सल्लागार नलिनी भट, डॉ. सेंटिल वेल, तिरुनवकारसा, टी. सी. बेंझामिन आणि महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांना देण्यात यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले.>काय आहे केस?पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०११मध्ये केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने आदर्श सोसायटी पाडण्याचा आदेश सरकारला दिला. या आदेशाविरुद्ध सोसायटीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसरी याचिकाही आदर्श सोसायटीनेच केली होती. महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) रद्द करत पाणी व वीजपुरवठा बंद केल्याबद्दल सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली. तर तिसरी याचिका खुद्द संरक्षण मंत्रालयाने केली. त्या उच्च न्यायालयाने निकाली काढल्या.