शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

रस्त्यांची ‘क्वालिटी’ तपासणीसाठी शासकीय संस्थेचा विचार

By admin | Updated: December 16, 2015 03:03 IST

रस्त्यांवरील बराचसा खर्च हा क्वालिटी कंट्रोल तपासणीवर खर्च होतो. त्यामुळे रस्त्यांची क्वालिटी तपासणी शासकीय संस्था असावी, यावर विचार सुरू असल्याचे गृहराज्यमंत्री

नागपूर : रस्त्यांवरील बराचसा खर्च हा क्वालिटी कंट्रोल तपासणीवर खर्च होतो. त्यामुळे रस्त्यांची क्वालिटी तपासणी शासकीय संस्था असावी, यावर विचार सुरू असल्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले. विधानसभेत मंगळवारी ज्योती कलानी, सुनील देशमुख, पाटणी, शशिकांत शिंदे यांनी उल्हासनगर शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यातील गैरव्यवहारसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले की, उल्हासनगर शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामामध्ये गैरव्यवहार झालेला नाही. तथापि ५ सप्टेंबर रोजीच्या लोकमतमध्ये या आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी नागरिकांनी आंदोलने सुद्धा केली. उल्हासनगरमध्ये ४ प्रभागांमध्ये सन २०१५-१६ या वर्षात एकूण ३.८८ कोटी रकमेची कामे विहित पद्धतीने ई-निविदा प्रसिद्ध करून व त्यास समितीची मान्यता घेऊन कामे सुरू केली आहे. त्यापैकी आतापर्यंत २.५ कोटी रकमेची कामे पूर्ण झालेली आहेत. परंतु ठेकेदारास अद्याप देयके अदा केलेली नाही. पूर्ण झालेल्या कामात वापरलेल्या बांधकाम साहित्याचे नमुने कामाचा दर्जा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून या कामांचा गुणवत्ता तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसेच त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरीक्षण झाल्यानंतरच देयके अदा करण्याबाबत उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत योग्य कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)