शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'आर्यन खानला आज जामीन मिळावा, अशी प्रार्थना करतो'- राम कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 08:41 IST

'भाजप कधीच आर्यन खान, शाहरुख खान किंवा इतर कोणत्याही बॉलिवूड कलाकाराच्या विरोधात नव्हतं, आम्हाला त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे.'

ठळक मुद्दे भाजपचे नेते राम कदम यांनी आर्यन खानच्या बाजुने ट्वीट करत त्याला जामीन मिळण्याची प्रार्थना केली आहे.

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या(Aryan Khan) जामिनावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र भाजपचे आमदार राम कदम(Ram Kadam) यांनी यासंदर्भात ट्वीट करुन आर्यनच्या जामिनासाठी प्रार्थना केली आहे. राम कदम यांनी म्हणाले की, 'प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे.'

आर्यन खान प्रकरणाबाबत शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर भाजप पेटून उठली आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी प्रश्न विचारला की, ड्रग माफियांशी महाराष्ट्र सरकारचे काही संबंध आहेत का? शिवसेना नेते आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. भाजप कधीच आर्यन खान किंवा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात नाही. आम्ही शाहरुख खान किंवा इतर कोणत्याही बॉलिवूड कलाकाराच्या विरोधात नाही. त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे, असं राम कदम म्हणाले.

या धोकादायक प्रकरणात महाराष्ट्र सरकार ड्रग माफियांच्या विरोधात उभे राहील अशी अपेक्षा होती, पण खेळ त्यांच्यावरच उलटला. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही आगामी निवडणुकीसाठी या प्रकरणाचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला. आपल्या घरातील तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रगच्या विरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र येऊ शकतात का? बरं, बदललेल्या भारताचा संदेश नक्कीच गेला आहे की कायद्यापुढे कोणी श्रीमंत, गरीब, नेता, अभिनेता नाही, सर्व समान आहेत. आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब,नेता,अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत़. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले. त्याने ड्रग्सच्या विरोधात प्रखर लढाई उभी करुन युवकांना ड्रग्स पासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करावे, असंही राम कदम म्हणाले.

प्रश्न उद्भवतो की ज्याप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार आणि इतर मंत्री पत्रकार चर्चा करून एनसीबीवर सतत टीका करत आहेत. ज्या प्रकारे एनसीबी अधिकाऱ्यांची बदनामी करत आहे आणि त्यांचा अपमान करत आहे. त्यांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण सरकार ड्रग माफियांच्या पाठीशी उभे आहे. ड्रग माफिया आणि महाराष्ट्र सरकार यांचा काय संबंध आहे हे सांगत राम कदम यांनी एक व्हिडिओ जारी केला. महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांना ड्रग माफियांकडूनही वसुली मिळत आहे का? कदाचित याच कारणामुळे ते ड्रग माफियांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत, अशी टीकाही राम कदमांनी केली आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानRam Kadamराम कदमDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोShahrukh Khanशाहरुख खान