शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

इचलकरंजी वस्त्रोद्योगात मॉडेल सिटी करू

By admin | Updated: October 13, 2014 00:42 IST

पृथ्वीराज चव्हाण : सुरेश हाळवणकर यांना इचलकरंजीकरांनी नाकारावे

इचलकरंजी : इचलकरंजी हे देशातील वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. म्हणूनच या शहराला वस्त्रोद्योगातील आदर्श शहर म्हणून विकसित करावयाचे आहे. ज्यामुळे इचलकरंजी देशाच्या वस्त्रोद्योगातील ‘मॉडेल सिटी’ ठरेल. तसेच या शहराला वाय-फाय सिटी करू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.येथील घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित केलेल्या प्रचार सभेत चव्हाण बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. हाळवणकर हे वीज चोरी करणारे एकमेव आमदार आहेत, असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात एकीकडे शेतकरी वीज कपातीला तोंड देत असताना वीज चोरी करणारा लोकप्रतिनिधी इचलकरंजीतील असल्याची खंत वाटते. जनतेने अशा व्यक्तीला कदापिही स्वीकारू नये. भाजपचे सर्वेसर्वा असणारे नरेंद्र मोदी व अमित शहा महाराष्ट्राला संपविण्यासाठी छुपे राजकारण करीत आहेत, असा आरोप करून ते म्हणाले, केंद्रात सत्तेत आल्यापासून गेल्या चार महिन्यांत त्यांनी अनेक प्रकल्प गुजरातला हलविले. त्यांचा मुख्यमंत्री येथे येऊन मुंबईतील उद्योजकांना गुजरातमध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत. अशा मोदींना आणि मोदींच्या भाजपला महाराष्ट्रातील जनता कधीही स्वीकारणार नाही; पण मोदी मात्र सध्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून सभा घेत सुटले आहेत. मोदी मॅजिक टिकविण्याचा आटापिटा करीत आहेत.माझ्या शासनामध्ये धरणात पाणी नसताना, काही तरी म्हणणारे, तसेच कालच्या तासगावच्या सभेत बेजबाबदारपणाचे गैर उद्गार काढणारे मंत्री असतानासुद्धा त्यांना बरोबर घेत अनेक चांगले निर्णय घेतले गेले. दुष्काळ असूनसुद्धा आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाही आपल्या शासनाने दुष्काळ आणि या गारपिटीचा सक्षमपणे सामना केला आणि शेतकऱ्यांना मदत दिली. या सभेमध्ये प्रकाश आवाडे, खासदार प्रकाश हुक्केरी, माजी खासदार जयवंतराव आवळे, भरमूअण्णा पाटील, नगरसेवक शशांक बावचकर, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, राहुल खंजिरे, किरण कटके, नगरसेवक मोहन कुंभार, संतोष कांदेकर, बाळासाहेब देसाई यांची भाषणे झाली. अहंकारापोटी २५ वर्षांच्या मित्राला काडीमोडभाजपने आपल्या अहंकारापोटी २५ वर्षांच्या मित्राला-शिवसेनेला काडीमोड दिला. ‘अच्छे दिन आनेवाले’ म्हणणाऱ्या भाजपकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकही चेहरा नाही, हे दुर्दैव आहे. निवडणुका झाल्यावर मोदी काय दिल्लीतून रिमोट कंट्रोलरने राज्य चालविणार आहेत काय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.