शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

उद्यापासून राज्यभर ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ अभियान - अशोक चव्हाण

By admin | Updated: July 11, 2017 20:48 IST

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. खोटे आकडे देऊन सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी

ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 11 - राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. खोटे आकडे देऊन सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि सरसकट सर्व शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसतर्फे उद्यापासून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ हे राज्यस्तरीय अभियान राबवणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली.  त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली सरकारने घातलेल्या जाचक अटी व शर्तींमुळे बहुतांशी शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांचा सातबारा कोरा झाला नाही अशा सर्व शेतक-यांच्या सह्या घेऊन सरकारला निवेदन देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही काँग्रेस पक्षाची मागणी कायम असून 30 जून 2017 पर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतक-यांचे कर्ज माफ करावे तसेच कर्जाचे पुनर्गठण झालेल्या सर्व शेतक-यांचे कर्ज माफ होईपर्यंत काँग्रेस पक्षाचा लढा सुरुच राहील असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
या बैठकीत जीएसटी कायद्याबाबत चर्चा झाली. जीएसटीबाबत जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. हे काँग्रेस सरकारचे जीएसटी विधेयक या विधेयकातील अटींमुळे व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जीएसटीमुळे भिवंडी, इचलकरंजी येथील कपडा उद्योग ठप्प झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे राज्यभरात विविध ठिकाणी सभा आणि चर्चासत्रांमधून जीएसटीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. पुण्यातून याची सुरुवात होईल असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, बस्वराज पाटील,खा. हुसेन दलवाई  विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, आ. भाई जगताप,  अमर काळे यांच्यासह नेते उपस्थित होते.