शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही

By admin | Updated: July 19, 2016 04:05 IST

जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात शनिवारी सात घरांमध्ये घरफोडी करण्यात आली.

मुंबई: जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात शनिवारी सात घरांमध्ये घरफोडी करण्यात आली. ज्यातील एक घर पंढरपुरला दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याचे होते. घरफोडीमुळे मात्र मी पुर्णपणे उधवस्त झालो असुन आता ‘आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही’ या भाषेत त्यांनी त्यांचे दु:ख बोलून दाखविले. त्यामुळे पोलीस आता या घरफोडीची उकल किती दिवसात करणार याकडे स्थानिकांचे लक्ष आहे.गणेश कदम असे या वारकऱ्याचे नाव असून ते मेघवाडी परिसरात राहतात. कदम यांना तीन वर्षे कमरेखालील अर्धांगवायूमुळे परळच्या केईएम रुग्णालयात उपचार घेत अंथरुणाला खिळून राहावे लागले. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांना चालता येऊ लागले. त्यामुळे सर्व कुटुंबाने पंढरपुर याठिकाणी देवदर्शनाला जाण्याचे ठरविले. त्यासाठी गावातून त्यांच्या आई वडिलांना देखील बोलावले. त्यानुसार त्यांची आई याठिकाणी आली. मात्र गावातील त्यांचे जवळपास १५ ते १६ तोळे सोने त्यांनी सोबत मुंबईला आणले. तसेच कदम यांच्या पत्नीचेही १५ तोळे सोने असे जवळपास तीस तोळे सोने त्यांनी मेघवाडीतील घरातच ठेवले. शुक्रवारी ते पंढरपूरला पोहोचले. शनिवारी त्यांचा फोन बंद होता. रविवारी त्यांना या चोरीबाबत समजले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शुन्यापासुन उभे केलेले सर्व उद्धस्त झाले. त्याची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पोलिसांनीही कदम यांची तक्रार दाखल करवुन घेण्यास हयगय केली. ज्यामुळे अखेर त्यांना पोलीस ठाण्यावर मोर्चा न्यावा लागला. पोलिसांनी गुन्हा दाखल करविला असला तरी माझा गेलेला ऐवज मला परत मिळण्याची आशाच नाही. मला आत्महत्या करावीशी वाटतेय. पण माझ्या दोन मुलींकडे बघुन असे काही करता येत नाही. मुलींचे शिक्षण अर्धवट टाकून आणि माझी नोकरी सोडुन मी घर विकुन गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. >पोलिसांच्या कारवाईकडे स्थानिकांचे लक्षमेघवाडीतील घरफोडीप्रकरणी पोलीस आता या घरफोडीची उकल किती दिवसात करणार याकडे स्थानिकांचे लक्ष आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल करविला असला तरी गेलेला ऐवज मला परत मिळण्याची आशाच नाही. मला आत्महत्या करावीशी वाटतेय.मुलींचे शिक्षण अर्धवट टाकून आणि माझी नोकरी सोडुन मी घर विकुन गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे असे गणेश कदम यांनी सांगितले.