शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही

By admin | Updated: July 19, 2016 04:05 IST

जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात शनिवारी सात घरांमध्ये घरफोडी करण्यात आली.

मुंबई: जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात शनिवारी सात घरांमध्ये घरफोडी करण्यात आली. ज्यातील एक घर पंढरपुरला दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याचे होते. घरफोडीमुळे मात्र मी पुर्णपणे उधवस्त झालो असुन आता ‘आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही’ या भाषेत त्यांनी त्यांचे दु:ख बोलून दाखविले. त्यामुळे पोलीस आता या घरफोडीची उकल किती दिवसात करणार याकडे स्थानिकांचे लक्ष आहे.गणेश कदम असे या वारकऱ्याचे नाव असून ते मेघवाडी परिसरात राहतात. कदम यांना तीन वर्षे कमरेखालील अर्धांगवायूमुळे परळच्या केईएम रुग्णालयात उपचार घेत अंथरुणाला खिळून राहावे लागले. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांना चालता येऊ लागले. त्यामुळे सर्व कुटुंबाने पंढरपुर याठिकाणी देवदर्शनाला जाण्याचे ठरविले. त्यासाठी गावातून त्यांच्या आई वडिलांना देखील बोलावले. त्यानुसार त्यांची आई याठिकाणी आली. मात्र गावातील त्यांचे जवळपास १५ ते १६ तोळे सोने त्यांनी सोबत मुंबईला आणले. तसेच कदम यांच्या पत्नीचेही १५ तोळे सोने असे जवळपास तीस तोळे सोने त्यांनी मेघवाडीतील घरातच ठेवले. शुक्रवारी ते पंढरपूरला पोहोचले. शनिवारी त्यांचा फोन बंद होता. रविवारी त्यांना या चोरीबाबत समजले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शुन्यापासुन उभे केलेले सर्व उद्धस्त झाले. त्याची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पोलिसांनीही कदम यांची तक्रार दाखल करवुन घेण्यास हयगय केली. ज्यामुळे अखेर त्यांना पोलीस ठाण्यावर मोर्चा न्यावा लागला. पोलिसांनी गुन्हा दाखल करविला असला तरी माझा गेलेला ऐवज मला परत मिळण्याची आशाच नाही. मला आत्महत्या करावीशी वाटतेय. पण माझ्या दोन मुलींकडे बघुन असे काही करता येत नाही. मुलींचे शिक्षण अर्धवट टाकून आणि माझी नोकरी सोडुन मी घर विकुन गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. >पोलिसांच्या कारवाईकडे स्थानिकांचे लक्षमेघवाडीतील घरफोडीप्रकरणी पोलीस आता या घरफोडीची उकल किती दिवसात करणार याकडे स्थानिकांचे लक्ष आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल करविला असला तरी गेलेला ऐवज मला परत मिळण्याची आशाच नाही. मला आत्महत्या करावीशी वाटतेय.मुलींचे शिक्षण अर्धवट टाकून आणि माझी नोकरी सोडुन मी घर विकुन गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे असे गणेश कदम यांनी सांगितले.